spot_img
अहमदनगरMaratha reservation: सरकारचे निमंत्रण, जरांगे यांचा नकार! नेमकं प्रकरण काय?

Maratha reservation: सरकारचे निमंत्रण, जरांगे यांचा नकार! नेमकं प्रकरण काय?

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत जवळ येत चाललेली असताना सरकारमध्ये हालचाली वाढल्या आहेत. या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकांमध्ये जरांगे पाटील यांना सरकारने निमंत्रण दिले आहे. मात्र जरांगे पाटील यांनी बैठकीला जाणार नसल्याचे सांगितले आहे.

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. दिलेल्या मुदतीत सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे यांनी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. येत्या २० जानेवारीपर्यंत आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा आझाद मैदानावर आमरण उपोषण करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. अशातच, जरांगे यांच्या इशार्‍यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या वतीने हालचालींना कमालीचा वेग आला आहे.

मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे. बैठकीसाठी मनोज जरांगे यांना देखील उपस्थित राहण्यासाठी पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र, आपण या बैठकीला जाणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत बोलताना मराठा आरक्षणावर चार मॅरेथॉन बैठक होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली.

बैठकांसाठी आले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. मात्र, आम्ही त्यांना सांगितले आहे की, आमचीच विनंती आहे, तुम्ही तुमच्या स्तरावर बैठका घ्या. येण्यासाठी आमच्याकडे वेळ कमी आहे. तुमचा निर्णय आम्हाला कळवा. आम्हाला काय पाहिजे हे त्यांना माहिती आहे. आमचे दोन शब्द मध्ये घ्या, इतकेच आमचे म्हणणे आहे. तुम्ही ते शब्द घ्या, कायदा पारीत करा, आम्ही असलो काय किंवा नसलो काय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...

‘जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त होणार’; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती..

पुणे । नगर सहयाद्री:- राज्यातील जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी समिती...