spot_img
ब्रेकिंगMaratha Reservation:..तारीख ठरली! मराठा आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट,पहा..

Maratha Reservation:..तारीख ठरली! मराठा आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट,पहा..

spot_img

मुंबई।नगर सहयाद्री-
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केलं. उपोषण मागे घेताना त्यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत ते महाराष्ट्र दौऱ्यावर असून जनतेशी संवाद साधत आहेत. त्यातच अत्ता मराठा आरक्षणासंदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. आरक्षणाचा कायदा करण्यासाठी राज्य सरकारकडून २६ फेब्रुवारीपासून मुंबईत अधिवेशन बोलवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी मंगळवारी १९ डिसेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा केली होती. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात सांगितलं होतं.

मनोज जरांगे यांनी मांडली स्पष्ट भूमिका

महाराष्ट्र सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात वेळ मागण्यात आला आहे. दरम्यान २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिल तर पुढं काय? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange Patil) यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. आम्हाला कायम स्वरूपी आरक्षण हवंय, सरकारला मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यांनी दिलेला शब्द पाळून आरक्षण द्यावं, अन्यथा आम्ही आंदोलन पुकारु, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...