spot_img
महाराष्ट्रमनोज जरांगे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर प्रथमच टीका, म्हणाले...

मनोज जरांगे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर प्रथमच टीका, म्हणाले…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर व कधी कधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करताना दिसले. आता त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच टीका केली आहे.

ते म्हणाले आहेत की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वासच राहिला नसल्याची टीका केली आहे. जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवरील आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे. ते म्हणाले की, आम्ही आतापर्यंत मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला होता. त्यांचा आम्ही आजवर सन्मान ठेवला आहे. पण मुख्यमंत्र्यांनी विश्वासाला पात्र व्हायला हवं होतं तस झालं नसल्याचं ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुन्हे मागे घेऊ असं आश्वासन दिलं. पण तेही केलं नाही. तिथेही ते विश्वासाला पात्र ठरले नाहीत. अंतरवालीतील गुन्हे मागे घेऊ म्हटले. तिथेही विश्वासाला पात्र ठरले नाहीत. उलट आमच्याच लोकांना अटक केली. आमच्याच लोकांना नोटीसा देत आहेत, असा हल्लाच मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर चढवला.

दरम्यान ट्रॅक्टर मालकांना दिलेल्या नोटिसींबाबत ते म्हणाले की, नोटिसा दिल्याने वातावरण दुषित होत असून लोकांत रोष आहे. लोकांना लोकशाहीच्या मार्गाने मुंबईत येऊ द्या. तुम्ही असं काय करत आहात? तुम्ही कायदा का पायदळी तुडवता. तुम्ही शांततेचं आंदोलन होऊ द्या. ते होणारच आहे. तुम्ही गोळ्या जरी घातल्या ना तरी आम्ही माघार घेणार नाही. आम्ही मागे हटत नाही आता, असं जरांगे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विखे पाटलांनी साधला शरद पवारांवर साधला; म्हणाले तुतारी फुंकून काही…

सांगोला / नगर सह्याद्री - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुतारी फुंकून कुठे...

सावधान! विनापरवाना पोस्टर्स लावणाऱ्यावर ‘ती’ कारवाई होणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरात विनापरवाना भिंतीवर, सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करण्याचे...

व्यापारी असोसिएशनचा आयुक्तांपुढे समस्यांचा पाढा; मागणी काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील प्रमुख बाजारपेठेला अतिक्रमण धारकांनी विळखा घातला आहे. या अतिक्रमणांमुळे...

प्रियसीसाठी बायकोला सोडलं, मग तिसरीसोबत जुळलं, खटके उडताच नको तेच घडलं…

Maharashtra Crime News: प्रियकराने प्रियसीचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, तरूणाने गर्लफ्रेंडसाठी...