spot_img
महाराष्ट्रमनोज जरांगे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर प्रथमच टीका, म्हणाले...

मनोज जरांगे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर प्रथमच टीका, म्हणाले…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर व कधी कधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करताना दिसले. आता त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच टीका केली आहे.

ते म्हणाले आहेत की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वासच राहिला नसल्याची टीका केली आहे. जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवरील आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे. ते म्हणाले की, आम्ही आतापर्यंत मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला होता. त्यांचा आम्ही आजवर सन्मान ठेवला आहे. पण मुख्यमंत्र्यांनी विश्वासाला पात्र व्हायला हवं होतं तस झालं नसल्याचं ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुन्हे मागे घेऊ असं आश्वासन दिलं. पण तेही केलं नाही. तिथेही ते विश्वासाला पात्र ठरले नाहीत. अंतरवालीतील गुन्हे मागे घेऊ म्हटले. तिथेही विश्वासाला पात्र ठरले नाहीत. उलट आमच्याच लोकांना अटक केली. आमच्याच लोकांना नोटीसा देत आहेत, असा हल्लाच मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर चढवला.

दरम्यान ट्रॅक्टर मालकांना दिलेल्या नोटिसींबाबत ते म्हणाले की, नोटिसा दिल्याने वातावरण दुषित होत असून लोकांत रोष आहे. लोकांना लोकशाहीच्या मार्गाने मुंबईत येऊ द्या. तुम्ही असं काय करत आहात? तुम्ही कायदा का पायदळी तुडवता. तुम्ही शांततेचं आंदोलन होऊ द्या. ते होणारच आहे. तुम्ही गोळ्या जरी घातल्या ना तरी आम्ही माघार घेणार नाही. आम्ही मागे हटत नाही आता, असं जरांगे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात बिबट्याची भीती; गावांना दिवसा वीज पुरवठा करावा

माजी सभापती अभिलाष घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट यांची महावितरणकडे मागणी सुनील चोभे | नगर सह्याद्री गेल्या...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भिजतं घोंगडं; याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत मोठी...

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट पारनेर | नगर सह्याद्री गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...