spot_img
ब्रेकिंगस्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

spot_img

राहता । नगर सहयाद्री:-
स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१ हजार ३६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ओदिशा आणि राज्यातून गांजा विक्रीसाठी पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी नितीन उर्फ आण्णा जाधव (रा.निमगाव कोऱ्हाळे, शिर्डी ता.राहाता (फरार) साईनाथ उर्फ शिरीष गायकवाड, स्वीफ्ट कार क्रमांक (एमएच-१७-सीएक्स-४४६६ वरील चालक) नाव माहित नाही (फरार) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करण्याची आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकाला अवैध धंद्यांची माहिती काढुन कारवाई करण्याच्या सुचना केल्या. पथकाला इको कार क्रमांक (एमएच-१५-ईक्यु-९२२२) व स्विफ्ट कार क्रमांक (एमएच-१७-सीएक्स-४४६६) या वाहनातील इसम ओडीसा राज्यातुन गांजा विक्रीसाठी राहता ते शिर्डी रोडने जाणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पथकाने राहता ते शिर्डी रोडवरील साकुरी शिवारातील सापळा रचला. दरम्यान दोन्ही वाहनांना थांबविण्याचा इशारा केला असता इको कारवरील चालकाने वाहन थांबविली. मात्र स्वीफ्ट कार चालकाने धूम ठोकली. पोलिसांनी अरूण मोतीलाल विश्वकर्मा (वय 45, रा. नाशिक ) यास ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी करत १३ किलो गांजा जप्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...