spot_img
ब्रेकिंगस्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

spot_img

राहता । नगर सहयाद्री:-
स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१ हजार ३६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ओदिशा आणि राज्यातून गांजा विक्रीसाठी पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी नितीन उर्फ आण्णा जाधव (रा.निमगाव कोऱ्हाळे, शिर्डी ता.राहाता (फरार) साईनाथ उर्फ शिरीष गायकवाड, स्वीफ्ट कार क्रमांक (एमएच-१७-सीएक्स-४४६६ वरील चालक) नाव माहित नाही (फरार) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करण्याची आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकाला अवैध धंद्यांची माहिती काढुन कारवाई करण्याच्या सुचना केल्या. पथकाला इको कार क्रमांक (एमएच-१५-ईक्यु-९२२२) व स्विफ्ट कार क्रमांक (एमएच-१७-सीएक्स-४४६६) या वाहनातील इसम ओडीसा राज्यातुन गांजा विक्रीसाठी राहता ते शिर्डी रोडने जाणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पथकाने राहता ते शिर्डी रोडवरील साकुरी शिवारातील सापळा रचला. दरम्यान दोन्ही वाहनांना थांबविण्याचा इशारा केला असता इको कारवरील चालकाने वाहन थांबविली. मात्र स्वीफ्ट कार चालकाने धूम ठोकली. पोलिसांनी अरूण मोतीलाल विश्वकर्मा (वय 45, रा. नाशिक ) यास ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी करत १३ किलो गांजा जप्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...