spot_img
ब्रेकिंगमहायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? भाजप ३२, शिवसेना १२ तर अजितदादा गटाला केवळ...

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? भाजप ३२, शिवसेना १२ तर अजितदादा गटाला केवळ ४ जागा?

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : सध्या लोकसभेच्या अनुशंघाने सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सध्या कुणाच्या वाट्याला किती जागर येणार? महायुतीत व महाविकास आघाडीत कोणाला किती जागा मिळणार याविषयी विविध चर्चा सुरु आहेत. सध्या महाविकास आघाडीत जवळपास ४० जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. फक्त ८ जागांवरुन तिढा कायम आहे. तर दुसरीकडे आता भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीमधील घटकपक्षांची जागावाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमध्ये लोकसभेला 32-12-4 या सूत्रानुसार जागावाटप होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपच्या वाटयाला सर्वाधिक 32 जागा येतील. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला 12 जागा येतील. तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागू शकते. त्यामुळे अजित पवार नाराज होण्याची शक्यता आहे. परंतु, लोकसभेला भाजपला अधिक जागा मिळाल्या तरी विधानसभेला शिंदे गट आणि अजित पवार गटाला चांगला वाटा मिळू शकतो असे म्हटले जात आहे.

महाविकास आघाडीत ठाकरे गटास १८ जागा
महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येही जागावाटपाची चर्चा सुरु आहे. ही चर्चा आता जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. मविआच्या नेत्यांमध्ये ४० जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्याकडून १८ लोकसभा मतदारसंघांमध्ये समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गट लोकसभेच्या या १८ जागा लढवणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे बोलले जाते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...