spot_img
ब्रेकिंगloksabha election : लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं ठरलं; १० तारखेला घोषणा

loksabha election : लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं ठरलं; १० तारखेला घोषणा

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
loksabha election : येत्या दोन महिन्यात देशात लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे. यासाठी आतापासूनच सगळे पक्ष कामाला लागले आहे. यातच राज्यातील महाविकास आघाडी, म्हणजेच शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे, अशी माहिती समोर येत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी माहिती दिली आहे.

महाविकास आघाडीचे जागावाटप 10 तारखेला निश्चित होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. याआधी शुक्रवारी मुंबईतील ट्रायडंट हॅाटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठिकाला महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ही उपस्थित होते.

इंडिया आघाडीत सामील करुन घ्या, याबाबत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी अनेकदा जाहीरपणे भूमिका मांडली होती. त्याअनुषंगाने आता महाविकास आघाडीत देखील अधिकृतपणे आंबेडकरांची एंट्री झाली आहे. प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच आपल्या टीमसोबत बैठकीसाठी ट्रायडंट येथे हजर राहिले.

शुक्रवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नाना पटोले उपस्थित होते. तर ठाकरे गटाकडून संजय राऊत उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले आहेत की, ”प्रकाश आंबेडकर हे आज (शुक्रवारी) बैठकीत सामील झाले. पुढची दिशा ठरली असून सकारात्मक चर्चा झाली. भाजपाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत होईल, असं काहीही करायचं नाही.”

ते म्हणाले, देशातील वातावरण बदलण्सासाठी आम्ही एकत्र राहणार. भाजपाचा पराभव ही आमची प्राथमिकता असून त्यानंतर जागावाटप. तसेच आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे राऊत म्हणाले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...