spot_img
ब्रेकिंगमहाराष्ट्र हादरला! शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याला जिवंत जाळलं

महाराष्ट्र हादरला! शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याला जिवंत जाळलं

spot_img

नाशिक । नगर सहयाद्री:-
शेतजमिनीच्या वादातून एका वृद्ध शेतकऱ्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एका गावात घडली. कचेश्वर नागरे (वय ८०) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी मयताच्या कुटुंबीयांनी केली असून जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नागरे कुटुंबियांनी घेतली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी: शेतातील वडिलोपार्जित विहिरीवरुन नागरे बंधूंमध्ये वाद आहे. कचेश्वर नागरे हे मंगळवारी शेतातील घराजवळ साफसफाई करत असताना त्यांचा धाकटा भाऊ चांगदेव नगरे आणि भावजई आणि पुतण्यांनी कचेश्वर नागरे यांच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले. आगीच्या ज्वालांनी वेढल्यानंतर कचेश्वर नागरे स्वतःला वाचण्यासाठी सैरभैर पळू लागले.

त्यांचा आवाज ऐकून त्यांचे कुटुंबीय धावत बाहेर आले. तोपर्यंत आरोपी चांगदेव नागरे आणि त्याचे कुटुंब घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान, कचेश्वर नागरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ९५ टक्के भाजल्याने कचेश्वर नागरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...