spot_img
अहमदनगरखासदर विखे पाटलांचे पारनेरकराना मोठे आश्वासन? नेमकं काय म्हणाले, पहा..

खासदर विखे पाटलांचे पारनेरकराना मोठे आश्वासन? नेमकं काय म्हणाले, पहा..

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर शहराच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक कोटी ८१ लाखांचा निधी दिला होता. परंतु, पारनेरमध्ये विखे पाटलांचे नाव होईल म्हणून पारनेरच्या लोकप्रतिनिधीने व नगर पंचायतच्या सत्ताधार्‍यांनी सर्वसाधारण सभेची एनओसी दिली नाही. निधी पाठिमागे पाठविण्याचे पाप येथील सत्ताधार्‍यांनी केले असल्याचा हल्लाबोल खा. विखे यांनी केला. लोकसभेच्या निकालानंतर पाठिमागे गेलेला निधी परत देणार असल्याचे सांगत पारनेरचा पाणी प्रश्न आपण सोडविणार असल्याची ग्वाही खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.

पारनेर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात खा.डॉ.विखे पाटील पाटील यांनी उपस्थित नागरीकांशी संवाद साधला. जो रामाचा नाही तो कोणाच्याही कामाचा नाही, असा संदेश देत आयोध्येमध्ये राम मंदिराचे निर्माण करुन कोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षा पुर्ण करणा-या नरेंद्र मोदींनाच पुन्हा जनता जनार्दन तिस-यांदा पंतप्रधान करेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यत केला. देशामध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार आहे. ज्यांनी राम मंदिराचे दिलेले आश्वासन पुर्ण केले त्यांनाच सत्तेवर बसविण्याचा निर्धार देशातील नागरीकांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले.

पारनेर तालुयातील राजकारण वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न झाला. मागील साडेचार वर्षात ज्या गोष्टी तालुयात घडल्या त्यातून युवकांची हेळसांडच झाली. सर्वसामान्य लोकांमध्ये चीड निर्माण झाली. खदखद आणि झालेला त्रास बाहेर येवू लागला आहे. विजय औटींसारखा कार्यकर्ता जनतेचे अश्रू पुसण्यासाठी पुढे आला, याचा मोठा आधार पारनेरच्या जनतेला मिळाला असल्याचे खा.विखे पाटील म्हणाले.

तालुयात काय चालले आहे हे सर्वांना माहीती आहे. अन्याय करणा-या घटना सातत्याने घडत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा या शहराच्या पाणी योजनेसाठी येणा-या काळात आपल्याला काम करायचे आहे. शहराची पाणी योजना पुर्ण करण्याचा शब्द मी देत असून, मी जो शब्द देतो तो पुर्णच करतो अशी ग्वाही त्यांनी देतानाच, सर्व युवकांनी संयमाने राजकारण करावे, युवकांचे भविष्य खुप महत्वाचे आहे.

त्यांच्यासाठी आपल्याला आपल्याला काम करायचे आहे.रोजगाराची संधी निर्माण करणे हेच आपले उदिष्ट असून, जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासातून रोजगारची निर्मिती करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, व्यक्तिगत टिका करण्यापेक्षा विकासाच्या बाबींवर निवडणूकीत चर्चा होण्याची आवश्यकता आहे. मतदार संघातील जनता सुज्ञ असून, विकासाच्या आणि विचारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची परंपरा या निवडणूकीतही कायम राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यकत केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...