spot_img
ब्रेकिंगअखेर जरांगे पाटील यांनी मागितली माफी? दिलगिरी व्यक्त करत म्हणाले, मी १००...

अखेर जरांगे पाटील यांनी मागितली माफी? दिलगिरी व्यक्त करत म्हणाले, मी १०० टक्के..

spot_img

जालना। नगर सहयाद्री
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागितली आहे. मी काही अपशब्द वापरले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझे शब्द मागे घेतो. असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे यांनी आपल्या आमरण उपोषणावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. त्यांच्या या शब्दांचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. सरकारनेही या प्रकरणी कठोर भूमिका घेतली होती. परिणामी, मनोज जरांगे यांनी मंगळवारी एक पाऊल मागे घेत माफी मागितली आहे.

जरांगे पाटील नेमकं म्हणाले काय?
मी शिवीगाळ केली नाही. ते आमरण उपोषण होते. झाला प्रकार अनावधानाने झाला. मी आई-बहिणीवरून शिव्या दिल्या नाहीत. पण त्यांनी विधान भवनाच्या पटलावर मी असे बोलल्याचा दावा केला असेल, तर मी माझे शब्द मागे घेतो. दिलगिरी व्यक्त करतो.आमच्यासाठी आई -बहिणींहून काहीच मोठे नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालवणारे आहोत. त्यामुळे आमच्या तोंडातून चुकीचे शब्द गेले असतील तर मी १०० टक्के शब्द मागे घेतो व दिलगिरी व्यक्त करतो, असे जरांगे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...