spot_img
महाराष्ट्रअंतरवालीतील मंडप हटवल्याचं वृत्त येताच जरांगे रुग्णालयातून निघाले...पण पोलिसांनी..

अंतरवालीतील मंडप हटवल्याचं वृत्त येताच जरांगे रुग्णालयातून निघाले…पण पोलिसांनी..

spot_img

जालना / नगर सहयाद्री : मराठा आरक्षण आंदोलन दिवसागणिक वेगवेगळं वळण घेताना पाहायला मिळत आहे. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत आक्षेपार्ह भाषेचाही वापर केला.

त्यानंतर सरकारने कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली असून आज सकाळीच जरांगे पाटील यांची एसटीआयटीच्या मार्फत चौकशी करण्यात यावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिल्या होत्या. त्यानंतर आता पोलिसांकडून अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरील मंडप हटवण्यास सुरुवात करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. याबाबतची माहिती मिळताच रुग्णालयात असणारे मनोज जरांगे हे उपचार सोडून तातडीने अंतरवालीकडे निघाले होते. मात्र पोलिसांनी मंडप हटवण्यात येणार नसल्याचं आश्वासन दिल्यानंतर जरांगे हे पुन्हा रुग्णालयातच थांबले आहेत.

मंडप हटवण्याच्या हालचालींबाबत मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आक्रमक इशारा दिला आहे. “मंडप हटवत असल्याची बातमी आल्यानंतर सगळीकडेच खळबळ झाली होती. कारण गृहमंत्री वागतातच तसे. मात्र आता डीवायएसपी साहेबांनी आम्हाला मंडप हटवणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे. त्यांच्या शब्दाला मान देऊन मी इथं थांबत आहे.

नाही तर मी थेट अंतरवालीला निघालो होतो. दिलेला शब्द पाळा. मंडपाला, छत्रपतींच्या मूर्तीला हात लावला तर गृहमंत्र्यांना सुट्टी नाही,” असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान, “मला बळजबरीने अटक करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील करोडो मराठे उपोषण करतील. सरकारने मराठ्यांचा रोष ओढावून घेऊ नये. अजूनही वेळ गेली नाही. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा,” अशी मागणीही जरांगेंनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...