spot_img
महाराष्ट्रअंतरवालीतील मंडप हटवल्याचं वृत्त येताच जरांगे रुग्णालयातून निघाले...पण पोलिसांनी..

अंतरवालीतील मंडप हटवल्याचं वृत्त येताच जरांगे रुग्णालयातून निघाले…पण पोलिसांनी..

spot_img

जालना / नगर सहयाद्री : मराठा आरक्षण आंदोलन दिवसागणिक वेगवेगळं वळण घेताना पाहायला मिळत आहे. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत आक्षेपार्ह भाषेचाही वापर केला.

त्यानंतर सरकारने कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली असून आज सकाळीच जरांगे पाटील यांची एसटीआयटीच्या मार्फत चौकशी करण्यात यावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिल्या होत्या. त्यानंतर आता पोलिसांकडून अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरील मंडप हटवण्यास सुरुवात करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. याबाबतची माहिती मिळताच रुग्णालयात असणारे मनोज जरांगे हे उपचार सोडून तातडीने अंतरवालीकडे निघाले होते. मात्र पोलिसांनी मंडप हटवण्यात येणार नसल्याचं आश्वासन दिल्यानंतर जरांगे हे पुन्हा रुग्णालयातच थांबले आहेत.

मंडप हटवण्याच्या हालचालींबाबत मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आक्रमक इशारा दिला आहे. “मंडप हटवत असल्याची बातमी आल्यानंतर सगळीकडेच खळबळ झाली होती. कारण गृहमंत्री वागतातच तसे. मात्र आता डीवायएसपी साहेबांनी आम्हाला मंडप हटवणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे. त्यांच्या शब्दाला मान देऊन मी इथं थांबत आहे.

नाही तर मी थेट अंतरवालीला निघालो होतो. दिलेला शब्द पाळा. मंडपाला, छत्रपतींच्या मूर्तीला हात लावला तर गृहमंत्र्यांना सुट्टी नाही,” असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान, “मला बळजबरीने अटक करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील करोडो मराठे उपोषण करतील. सरकारने मराठ्यांचा रोष ओढावून घेऊ नये. अजूनही वेळ गेली नाही. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा,” अशी मागणीही जरांगेंनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...