spot_img
ब्रेकिंगनिमंत्रण फक्त राम भक्तांनाच! 'यांनी' साधला ठाकरे यांच्यावर निशाणा

निमंत्रण फक्त राम भक्तांनाच! ‘यांनी’ साधला ठाकरे यांच्यावर निशाणा

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील राम लल्लाच्या प्रतिष्ठापणेचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. तसेच निमंत्रण मिळण्याची शयता कमी आहे. या संदर्भात राम मंदिराचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, २२ जानेवारीला राम मंदिराच्या लोकार्पणासाठी फक्त रामाच्या भक्तांना निमंत्रण देण्यात आले आहे. या वक्तव्याने वादात भर पडण्याची शक्यता आहे.

जे रामाचे भक्त आहे त्यांनाच निमंत्रण देण्यात आले आहे. भाजप राम मंदिराच्या नावावर राजकारण करत आहे, असे म्हणणे अत्यंच चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वत्र आदर होत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात मोठं काम करुन दाखवले आहे.

हे काही राजकारण नाही, ही भक्ती आहे, असे दास म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्यावरुन भाजपवर निशाणा साधला होता. भाजप राम मंदिरावरुन राजकारण करत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उदात्तीकरण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

आचार्य सत्येंद्र दास यांनी खा. संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राऊत म्हणतात की प्रभु राम देखील भाजपकडून निवडणूक लढतील. राम मंदिराच्या मुद्यावरुन भाजप राजकीय पोळी भाजत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राम यांचा वापर करत आहे, अशी टीका राऊत यांनी केली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...