spot_img
महाराष्ट्रनाशिकमधून भुजबळ उमेदवारीसाठी आग्रही ! शिंदे गट संतप्त, राजकारणात ट्विस्ट

नाशिकमधून भुजबळ उमेदवारीसाठी आग्रही ! शिंदे गट संतप्त, राजकारणात ट्विस्ट

spot_img

नाशिक / नगर सह्याद्री : नाशिक लोकसभा मतदारसंघामधील जागावाटपावरून महायुतीमध्ये बरीच खडाजंगी सुरु असल्याचे दिसते. साताऱ्याच्या बदल्यात राष्ट्रवादीने नाशिकची जागा मागितली आहे. त्यामुळे तेथे मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी असेल म्हटले जाते. परंतु त्यामुळे आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून आणि दूरध्वनीवरुन नाशिकची जागा गेल्यास शिंदे गटाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होऊ शकतो? अशी तक्रार केली आहे.

आज दुपारी नाशिक शहरात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या कार्यालयात स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघ कोणाचा याबाबत चर्चा करण्यात आली. नाशिकचे विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचा आहे. त्यांनी युतीचा धर्म पाळून भाजपला पाठिंबा दिला आहे. शिंदे गटाने आजवर सातत्याने युतीचा धर्म पाळला आहे. त्यामुळे अन्य घटक पक्षांनी शिंदे गटाला टार्गेट करणे चुकीचे आहे. कोणत्याही स्थितीत नाशिक मतदारसंघ शिंदे गटालाच राहिला पाहिजे, अशी भूमिका आणि संतप्त भावना विविध पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...