spot_img
अहमदनगरपोलीस कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात; 'त्या' कर्मचाऱ्यांच्याही झाल्या बदल्या

पोलीस कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात; ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्याही झाल्या बदल्या

spot_img

एलसीबीतील आक्षेप घेतलेल्या कर्मचार्‍यांच्या झाल्या बदल्या

अहमदनगर | नगर सह्याद्री

अहमदनगर पोलिस दलातील पोलिस कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्यांना शनिवार पासून सुरूवात झाली आहे. सुमारे ४७६ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहे. दरम्यान खा नीलेश लंके यांनी आक्षेप घेतलेल्या स्थानिक गुन्हे शाखेतील आक्षेप घेतलेल्या पोलिस कर्मचार्‍यांच्या देखील बदल्या करण्यात आल्याची माहिती आहे.

पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी जिल्हा पोलीस दलातील ४७६ पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. ज्या पोलीस अंमलदारांना ३१ मे, २०२४ रोजी एका पोलीस ठाण्यात/ शाखेत पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा अंमलदारांकडून तीन पसंतीच्या ठिकाणासह अर्ज मागविण्यात आले होते. अशा बदलीपात्र अंमलदारांना आज येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी ११ वाजल्यापासून या प्रक्रियेला सुरूवात झाली. यात पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करणार्‍या पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात येत आहे.

दरम्यान खासदार नीलेश लंके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचार्‍यांवर आरोप केले होते. याबाबत त्यांनी उपोषणाचा देखील इशारा दिलेल्या होता. पोलिस प्रशासनातील आजपासून सुरू झालेल्या बदली प्रकियेत देखील आरोप करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांच्या देखील बदल्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; ‘या’ ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार...

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

अकोले | नगर सह्याद्री अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड...

‘मळगंगा देवीच्या घागर दर्शनासाठी लोटला जनसागर’

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता....