spot_img
अहमदनगरपोलीस कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात; 'त्या' कर्मचाऱ्यांच्याही झाल्या बदल्या

पोलीस कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात; ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्याही झाल्या बदल्या

spot_img

एलसीबीतील आक्षेप घेतलेल्या कर्मचार्‍यांच्या झाल्या बदल्या

अहमदनगर | नगर सह्याद्री

अहमदनगर पोलिस दलातील पोलिस कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्यांना शनिवार पासून सुरूवात झाली आहे. सुमारे ४७६ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहे. दरम्यान खा नीलेश लंके यांनी आक्षेप घेतलेल्या स्थानिक गुन्हे शाखेतील आक्षेप घेतलेल्या पोलिस कर्मचार्‍यांच्या देखील बदल्या करण्यात आल्याची माहिती आहे.

पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी जिल्हा पोलीस दलातील ४७६ पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. ज्या पोलीस अंमलदारांना ३१ मे, २०२४ रोजी एका पोलीस ठाण्यात/ शाखेत पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा अंमलदारांकडून तीन पसंतीच्या ठिकाणासह अर्ज मागविण्यात आले होते. अशा बदलीपात्र अंमलदारांना आज येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी ११ वाजल्यापासून या प्रक्रियेला सुरूवात झाली. यात पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करणार्‍या पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात येत आहे.

दरम्यान खासदार नीलेश लंके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचार्‍यांवर आरोप केले होते. याबाबत त्यांनी उपोषणाचा देखील इशारा दिलेल्या होता. पोलिस प्रशासनातील आजपासून सुरू झालेल्या बदली प्रकियेत देखील आरोप करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांच्या देखील बदल्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...