spot_img
ब्रेकिंगप्रशासनाचा नाकर्तेपणा! 'त्या' प्रश्नासाठी नारायणगव्हाणकर पुन्हा आक्रमक, दिला 'असा' इशारा

प्रशासनाचा नाकर्तेपणा! ‘त्या’ प्रश्नासाठी नारायणगव्हाणकर पुन्हा आक्रमक, दिला ‘असा’ इशारा

spot_img

सुपा / नगर सह्याद्री
भूसंपादन प्रक्रिया पार पाडून ग्रामस्थांना जागेचा योग्य मोबदला देऊन चौपदरीकरणाचे तातडीने काम पूर्ण करण्यात यावे. सदर काम प्रलंबित राहिल्यानंतर रस्त्यावर काही अपघातजन्य अनर्थ घटना घडल्यास संबंधित विभागाचे अधिकारी कार्यवाहीस जबाबदार राहतील तसेच दि.१० मार्च पासून काम सुरू झाले नाही तर ११ मार्च पासून गावांमध्ये आमरण उपोषण व ग्रामसंरक्षण आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके यांनी दिला.

नगर- पुणे महामार्गावर नारायणगव्हाणसह सुप्याच्या प्रलंबित चौपदरीकरणाच्या कामामुळे सातत्याने महामार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी होऊन अपघात घडत आहेत. सदर प्रश्नावर विविध आंदोलनाच्या माध्यमातून ग्रामस्थांकडून लक्ष वेधण्यात आले आहे. नारायणगव्हाण गावचे ९४५ पैकी ८१५ मीटरचे काम पूर्ण झाले आहे. परंतु १३० मीटरचे काम बाकी असून महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना महामार्गावर जाणे अत्यंत धोकादायक बनले आहे.

दिनांक १५ फेब्रुवारी रोजी तहसीलदार पारनेर यांच्या अध्यक्षतेखाली नारायणगव्हाण येथील रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एस.के भावसार उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग, अहमदनगर यांनी सदरचा प्रस्ताव दिनांक ०८ फेब्रुवारी रोजी भूसंपादन समन्वयक अधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्याबद्दल सांगितले. चौपदरीकरणाच्या कामासाठी अधिकार्‍यांच्या नियुक्तीचे काम जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रलंबित असून प्रस्ताव सादर करण्यापूर्वीच मोजणी फी उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे भरली आहे परंतु प्रस्ताव मान्यता मिळाली नसल्याचे तालुका उपाध्यक्ष भूमि अभिलेख यांनी सांगितले होते.

तात्काळ प्रस्तावाला मान्यता देऊन चौपदरीकरणाचे तातडीने काम पूर्ण करण्यात यावे. तसेच दि.१० मार्च पासून काम सुरू झाले नाही तर दिनांक ११ मार्च पासून गावांमध्ये आमरण उपोषण व अंदोलन करण्यात येईल. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे संबंधित विभागांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...