spot_img
अहमदनगरबनावट कागद पत्राद्वारे योजनेचा लाभ? 'कटके' अडकले जाळ्यात, 'असा' घडला प्रकार

बनावट कागद पत्राद्वारे योजनेचा लाभ? ‘कटके’ अडकले जाळ्यात, ‘असा’ घडला प्रकार

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
बनावट मासिक वेतन पत्रिका तयार करून भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुरूवारी (दि. ७) सायंकाळी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरूण संभाजी कटके व तुकेश अरूण कटके (दोघे रा. कटके मळा, जुना शिरसाठ वाडी रस्ता, पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रोहित शिवाजी कदम (रा. कराड रस्ता, पंढरपुर, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. तुकेश कटके याने अरूण कटके याच्या मासिक वेतन पत्रिकेyत फेरफार करून बनावट पत्रिका तयार केली.

भारत सरकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ती पत्रिका येथील समाज कल्याण कार्यालयाला सादर केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे सन २००५ ते २००७ मध्ये भारत सरकार शिष्यवृत्तीचा एकुण दोन हजार ११७ रूपयांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली. सदरचा प्रकार रोहित कदम यांनी येथील समाज कल्याण विभागाच्या निदर्शनास आणुन दिला.

त्यांनी कदम यांना १८ सप्टेंबर २०२३ रोजी पत्राव्दारे कळविले की, विद्यार्थ्याने तत्कालिन कालावधीत सक्षम अधिकारी यांच्या स्वाक्षरीचा उत्पन्नाचा दाखला महाविद्यालयास व महाविद्यालयाने ऑफलाइन अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह या कार्यालयास सादर केला आहे.

त्यानुसार या कार्यालयाकडून योजनेचा लाभ मंजूर केल्याचे दिसून येत आहे, असे उत्तर दिले. दरम्यान समाजकल्याण विभागाकडून पुढील कार्यवाहीस टाळाटाळ होत असल्याने कदम यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज केला होता. अर्ज चौकशीनंतर गुरूवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....