spot_img
अहमदनगरजरांगे पाटलांचे उपोषण स्थगित; सरकारला दिला 'असा' शब्दात कडक इशारा

जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित; सरकारला दिला ‘असा’ शब्दात कडक इशारा

spot_img

जालना | नगर सह्याद्री:-
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा ५ वा दिवस आहे. मात्र, आज मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यांनी यावेळी बोलताना त्यांचे कारण देखील सांगितले आहे. मनोज जरांगे यांची तब्येत ढासळल्याने त्यांना त्यांच्या गावकर्‍यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आणि उपचार घेण्याचा, सलाईन लावण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर आज मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती दिली आहे.

यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, मी उपोषण करायला तयार आहे. मात्र, गावकर्‍यांनी उपचार घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही. विना उपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे. सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही. खोटे आणि बेगडी उपोषण मी करणार नाही. उपचार बंद करा मी उपोषण करायला तयार आहे, असेही जरांगेंनी पुढे म्हटले आहे. तर सलाईन लावून पडून राहण्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं असेही जरांगेंनी म्हटले आहे.

सरकार आमरण उपोषण शक्तीला घाबरत आणि त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतात मला उपोषण करू द्या, म्हणून मी गावकर्‍यांना म्हणत होतो. रात्री गावकर्‍यांनी ऐकले नाही. त्यांनी मला सलाईन लावले. सलाईन वर पडू न राहण्यात उपयोग नाही, त्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं या मतावर मी आलो आहे. तिथे पडून राहण्यापेक्षा मी मतदार संघाची तयारी करेल असेही जरांगे पुढे म्हणालेत. या ठिकाणी पडून राहण्यापेक्षा पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली बरी. सरकारचा ज्या सत्तेत आणि खुर्चीत जीव आहे, त्यांच्यासाठीच्या तयारीला आपण लागले पाहिजे.

सभा, कार्यक्रम, निवडणुका, दौरे, कोणाला निवडून आणायचे कोणाला पाडायचे, कोणते आमदार विरोधात बोलत आहेत, कोणते खासदार विरोधात बोलत आहोेत त्यांचा बंदोबस्त लावणे गरजेचे आहे, एकच सांगतो. मराठा समाजाला कधीही भाजप सत्तेवर येऊ देऊ नका. म्हणून येथे उपचार घेत उपोषण करण्यापेक्षा एक दोन दिवस उपचार घेऊन तयारीला लागणार आहे. आज दुपारी बारा वाजता मी उपोषण स्थगित करणार आहे, अशी माहिती जरांगेंनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका
बीडच्या नेत्याचे पण तसेच केले त्यांच्याच बापाने भाजप वाढवली त्यांनाच पाय खाली चिरडले. ज्याच्या बापाने भाजप वाढवले त्यांनाच या देवेंद्र फडणवीसांनी संपवले, मराठ्यांच्या ओडताणीमुळे त्यांचा दहा वर्षाचा वनवास तरी संपला. हे देवेंद्र फडणवीस डाव खेळतात एवढ्या नीचपणाने सत्ता आणून तुमच्या कुटुंबाला फडणवीस काय सुख मिळणार आहे? अशा शब्दांत जरांगेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींसाठी ‘गुरुवार’ कसा? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...

मुहूर्त ठरला; शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ‘या’ तारखेला ‘सर्वोच्च’ सुनावणी

मुंबई । नगर सहयाद्री:- शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या पारंपरिक निवडणूक चिन्हाच्या मालकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेल्या दोन...

विधानसभेत गरजला पारनेरकरांचा आवाज! आ. दाते यांनी मांडला ‘तो’ प्रश्न; वेधले शासनाचे लक्ष

पारनेर । नगर सहयाद्री :- पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागात दि...