spot_img
अहमदनगरदारू पिऊन आल्यास होणार जबर धुलाई ! अहमदनगरमधील 'या' गावात ठराव

दारू पिऊन आल्यास होणार जबर धुलाई ! अहमदनगरमधील ‘या’ गावात ठराव

spot_img

अकोले / नगर सहयाद्री : दारूबंदी करण्यासाठी अनेक गावात विविध उपाययोजना होत असतात. परंतु आता अहमदनगर जिल्ह्यातील एका गावाने एक वेगळाच निर्णय घेतला आहे. गावकऱ्यांसह कोणीही पाहुणा गावात दारू पिऊन आल्याचे आढळून आल्यास त्याची गावकऱ्यांकडून यथेच्छ धुलाई करण्यात येईल, तसा ऐतिहासिक ठराव सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित अकोले तालुक्यातील इंदोरी ग्रामस्थांनी बहुमताने मंजूर केला आहे. 

सोमवारी गावकऱ्यांसह युक्क – गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रेत्यांना दारू विक्री न करण्याचे आवाहन केले. यानंतर दारू विकताना आढळून आल्यास गावकऱ्यांकडून मारहाण करून दुकान फोडून टाकू, असा इशारा दिला. दरम्यान, दुपारनंतर इंदोरी गावात बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून याची लेखी हमी व सह्या घेऊन इशारा दिला.

इंदोरी ग्रामस्थांनी दारूबंदीचा ठराव मंजूर करून दारूच्या बाटल्या फोडल्या. या कारवाईत बेकायदेशीर दारू विक्रेता स्वतःच सहभागी झाला व त्याने दुकानातून दारूच्या बाटल्या काढून देत फोडू लागला. गावातील चारही बेकायदेशीर दारू विक्रेत्यांकडून गावकऱ्यांनी तसे स्वाक्षरीसह लिहून घेतले. गावकऱ्यांसह युक्कांनी कोणी दारू पिऊन आढळून आल्यास हात साफ करून पोलिस ठाण्यात पाठवण्याचा इशारा दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....