spot_img
महाराष्ट्रपाच वर्षांपूर्वी माझी चूक झाली, मला माफ करा, नेमकं काय म्हणाले शरद...

पाच वर्षांपूर्वी माझी चूक झाली, मला माफ करा, नेमकं काय म्हणाले शरद पवार…

spot_img

राणांचा पराभव करण्याचे आवाहन
अमरावती | नगर सह्याद्री
गत लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने इथल्या अपक्ष उमेदवाराला (नवनीत राणा) पाठिंबा दिला होता. त्या उमेदवारासाठी मी अमरावतीत प्रचार सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि आम्ही ज्यांना पाठिंबा दिला, त्यांना खासदार केले. परंतु मागील ५ वर्षांचा त्यांचा कार्यकाळ पाहता माझी चूक झाली असे मला वाटते. अमरावतीकरांनी मला माफ करावे आणि झालेली चूक दुरूस्त करावी, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. अशी चूक माझ्याकडून होणार नाही असे सांगत नवनीत राणा यांचा पराभव करा, असे आवाहन पवार यांनी मतदारांना केले.

याआधी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंच्या पोटनिवडणुकीवेळी देखील शरद पवार यांनी सातारकरांची माफी मागितली होती. त्यावेळी सातारच्या जनतेने पवारांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देऊन श्रीनिवास पाटील यांना विजयी केले. त्यानंतर आता अमरावतीकर काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

अमरावती लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची सभा संपन्न झाली. नवनीत राणा यांचा मागील ५ वर्षांच्या कार्यकाळावर मविआ नेत्यांनी जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला विविध योजनांवरून धारेवर धरले. तर शरद पवार यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच नवनीत राणांना उमेदवारी देणे ही चूक होती, अशी जाहीर कबुली दिली.

शरद पवार म्हणाले, मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. गत लोकसभा निवडणुकीत इथल्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणे ही माझी चूक झाली. त्यांच्यासाठी मी जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि आम्ही ज्यांना पाठिंबा दिला, त्यांना खासदार केले. परंतु मागील ५ वर्षांचा त्यांचा कार्यकाळ पाहता मी अस्वस्थ होतो. कधीतरी इथे येऊन अमरावतीकरांची माफी मागावी असे वाटत होते. जनतेने आता चूक दुरुस्त करावी, असे आवाहन करत अशी चूक माझ्याकडून पुन्हा होणार नाही, असेही स्पष्ट केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....