spot_img
ब्रेकिंगAhmednagar: हुडहुडी वाढली! नगरचा पारा १० अंशावर, हवामान खाते म्हणाले, दोन दिवसात..

Ahmednagar: हुडहुडी वाढली! नगरचा पारा १० अंशावर, हवामान खाते म्हणाले, दोन दिवसात..

spot_img

अहमदनगर| नगर सह्याद्री-
जिल्ह्यात थंडीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अहमदनगरसह नाशिक, पुणे येथे सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे. पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नगरचा पारा ११ ते १२ अंशावर आला असून आणखी दोन दिवसात तो १० ते ९ अंशापर्यंत खाली येण्याची शयता हवामान विभागाने वर्वतली आहे.

नगरमधील वातावरण चांगलेच थंड झाले आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर नगरचा पारा १० ते ११ अंशावर आला होता. बुधवारी व गुरुवारीही सकाळपासून गार वारा सुरू आहे. बुधवारी नाशिक, पुणे, जळगावसह नगरचे तापमान सर्वात थंड होते. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याने रब्बी पिकांना चांगला फायदा होत आहे.

जानेवारी महिन्यात पडलेल्या थंडीमुळे गहू, हरभर्‍याच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जानेवारी अखेरपर्यंत थंडीचा कडाका कायम राहील, असे म्हटले जात आहे. बुधवारी नाशिक (९ अंश), अहमदनगर (९.३ अंश), पुणे (९.७ अंश), जळगाव (९.९ अंश), छत्रपती संभाजीनगर (१०.२ अंश) असे तापमान नोंदवले गेले. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर दिवसाच्या तापमानात हळूहळू वाढ होईल. १५ फेब्रुवारीनंतर रात्रीचा पारा १४ अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
तलाठी परीक्षेची निवड यादी जाहीर

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; ‘या’ ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार...

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

अकोले | नगर सह्याद्री अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड...

‘मळगंगा देवीच्या घागर दर्शनासाठी लोटला जनसागर’

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता....