spot_img
अहमदनगरPolitics News: राज्यात महायुतीला किती जागा मिळणार? आमदार रोहित पवारांनी तर आकडाच...

Politics News: राज्यात महायुतीला किती जागा मिळणार? आमदार रोहित पवारांनी तर आकडाच सांगितला..

spot_img

नाशिक | नगर सह्याद्री
देशासह राज्यभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. लोकसभेत देशात ४०० पार अन् राज्यात ४५ प्लसचे ध्येय घेऊन मैदानात उतरलेल्या भाजप, महायुतीच्या नेत्यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार? याबाबत वेगवेगळे अंदाज राजकीय नेते वर्तवत आहेत. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीला १६ ते १७ जागा मिळतील असा दावा केेला आहे.

महायुतीकडून मोठ्या प्रमाणात पैसे आणि गुंडागर्दीचा वापर सुरू आहे. मात्र पक्ष आणि कुटुंब फोडल्यामुळे भाजपाचाच मतदार पक्षावर नाराज आहे. देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी राजकीय पातळी खाली आणली त्यामुळे सामान्य नागरिक नाराज आहे. भाजपाचे मतदार बाहेर निघत नाहीयेत, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

तसेच भाजपाचा मतदार बाहेर न आल्याने याचा फायदा महाविकास आघाडीला फायदा होईल, असे म्हणत भाजपला १३ ते १४, शिंदे गटाला २ ते ३ जागा आणि अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही तसेच एकूण महायुतीला १६ ते १७ जागा मिळतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

दरम्यान, सत्ताधार्‍यांकडून २ हजार कोटी रुपये या निवडणुकीत लोकांना वाटण्यात येणार आहेत असा आम्हाला अंदाज आहे. लोकांना विचारले तर ते सांगत आहेत पैसे महायुतीच्या लोकांकडून आलेत.

बारामती आणि नगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करण्यात आला. पण पैशांचे वापर केला तरी काही उपयोग होणार नाही, अशी टीकाही रोहित पवार यांनी यावेळी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...