spot_img
अहमदनगरआज महाराष्ट्रात मुसळधार;'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार

आज महाराष्ट्रात मुसळधार;’या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री

पावसामुळे खरीप पिकांना जीवदान, राज्यात पाणीसाठ्यांत वाढ

राज्यात जून महिन्यात काही भागात पावसाने दडी मारली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं असून बळीराजा सुखावला आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तास राज्यात पावसाची स्थिती अशीच राहणार आहे.

पावसाचा अंदाज आणि अलर्ट

हवामान खात्याने शुक्रवारी पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस उघडीप घेऊ शकतो. आयएमडीच्या अंदाजानुसार, कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. रायगड आणि सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर तसेच पुण्यासह किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम घाटात पावसाचे प्रमाण जास्त राहू शकते, त्यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

आज पावसाची शक्यता असलेले भाग
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज बुधवारी नंदूरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाचा प्रभाव आणि पाणीसाठा
राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्व धरणांमध्ये ३९.१७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये ५३.१२ टक्के इतका पाणीसाठा आहे. औरंगाबाद विभागात सर्वात कमी म्हणजे १२.१३ टक्के पाणीसाठा आहे, तर नाशिक विभागात २८.३४ टक्के पाणीसाठा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...