spot_img
अहमदनगरआज महाराष्ट्रात मुसळधार;'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार

आज महाराष्ट्रात मुसळधार;’या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री

पावसामुळे खरीप पिकांना जीवदान, राज्यात पाणीसाठ्यांत वाढ

राज्यात जून महिन्यात काही भागात पावसाने दडी मारली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं असून बळीराजा सुखावला आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तास राज्यात पावसाची स्थिती अशीच राहणार आहे.

पावसाचा अंदाज आणि अलर्ट

हवामान खात्याने शुक्रवारी पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस उघडीप घेऊ शकतो. आयएमडीच्या अंदाजानुसार, कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. रायगड आणि सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर तसेच पुण्यासह किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम घाटात पावसाचे प्रमाण जास्त राहू शकते, त्यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

आज पावसाची शक्यता असलेले भाग
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज बुधवारी नंदूरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाचा प्रभाव आणि पाणीसाठा
राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्व धरणांमध्ये ३९.१७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये ५३.१२ टक्के इतका पाणीसाठा आहे. औरंगाबाद विभागात सर्वात कमी म्हणजे १२.१३ टक्के पाणीसाठा आहे, तर नाशिक विभागात २८.३४ टक्के पाणीसाठा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...