रविवारी झाला ४३ मिलीमिटर पाऊस | जिल्ह्यात सरासरी १७०.६ मिलीमिटर पाऊस
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
गेल्या दहा-बारा दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. शनिवार-रविवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस झाला. त्यामुळे गावोगावच्या नद्याही वाहत्या झाल्या. रविवारी जिल्ह्यात ४३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली तर आत्तापर्यंत जिल्ह्यात १७० मिलीमिटर पाऊस झाला आहे. मे महिन्यात पहिल्यांदाच अहिल्यानगर जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. तसेच नगर शहर व नगर अहिल्यानगर तालुक्यात सीना नदीच्या उगमस्थानी सुरु असलेल्या संततधार पावसामुळे सीना नदीला पूर आला आहे.
गेल्या दहा-बारा दिवसांपासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात संततधार सुरु आहे. शनिवारी १२ महसूल मंडलात अतिवृष्टी झाली तर रविवारी २९ मंडलात अतिवृष्टी झाली आहे. खेड महसूल मंडलात १३६.३ सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. पुढील तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे तर २९ व ३० मे रोजी हलका व मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.
२३ मंडलात अतिवृष्टी
भिंगार ७३.३, नागापूर ७५, चिचोंडी ६६.३, चास ९३, नेप्ती ७२.८, पारनेर ६८.३, भाळवणी ९०.५, सुपा ७७, वाडेगव्हाण ६२.५, कान्हूर पठार ६०, पळवे खु. ६६, पेडगाव ९४, देवदैठण ७६.८, भानगाव ८२.८, आढळगाव ८२.८, कर्जत १०३, भांबोरा ८४.५, कोंभळी ७४.३, माही ७२, वालवड १०३, खेड १३६.३, करंजी ६०.८, मिरी ६२.५, तिसगाव ६०.३, सोनई ६२.३, राहुरी ६४.८, टाकळीमिया ६४.८, ब्राम्हणी ६५, वांबोरी ६३.५ मिलीमिटर पाऊस झाला.
रविवारी झालेला तालुकानिहाय पाऊस
नगर ५२.४, पारनेर ६२.६, श्रीगोंदा ५७.४, कर्जत ७२, जामखेड ३२, शेवगाव ४८, पाथर्डी ४२.२, नेवासा ४०.४, राहुरी ४८.८, संगमनेर ३२.१, अकोले ३५.७, कोपरगाव १३.५, श्रीरामपूर ८.२, राहाता १२.९ मिलीमिटर पाऊस झाला.
पारनेरला मान्सूनपूर्व पावसाचा जोर ; तिखोल परिसरात काळु नदीला पूर; धरणात पाण्याची आवक
पारनेर | नगर सह्याद्री
गेल्या ११ दिवसांपासून पारनेर तालुयात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तालुयातील अनेक भागांत आज पर्यंत २३६.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, १० मंडलांमध्ये सरासरी २३६.९ मिलीमिटर पाऊस झाला आहे.
यामध्ये भाळवणी (४०४.९ मिमी), सुपा (२९९.५ मिमी), निघोज (२६६.७ मिमी), पारनेर (२६४.६ मिमी), वाडेगव्हाण (२३३.८ मिमी), टाकळी ढोकेश्वर (२१५.६ मिमी), पळवे (२४८.४ मिमी), वडझिरे (१६२.३ मिमी), पळशी (१५१.७ मिमी) आणि कान्हूर पठार (१२४.३ मिमी) अशी पावसाची आकडेवारी आहे. तिखोल, ढोकी, काकणेवाडी, टाकळी ढोकेश्वर, वासुंदे, कर्जुले हर्या सावरगाव यांसारख्या भागांत ओढ्यांना पाणी आले आहे. तिखोल भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे काळू नदी दुधडी भरून वाहू लागली आहे. तिखोल येथील धरणामध्ये सुद्धा पाण्याची आवक झाली आहे. या पावसाने शेतकर्यांना दिलासा मिळाला असला, तरी कांदा उत्पादक शेतकरी मात्र दुहेरी संकटात सापडले आहेत. शेतात किंवा बांधावर असलेल्या कांदा साठवण ऐरणीत पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. कांद्याला बाजारात कमी भाव मिळत असताना, आता अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान वाढले आहे. यामुळे शेतकर्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सुपा, भाळवणी, निघोजसह इतर भागांतील शेतकर्यांनी प्रशासनाकडे तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. पावसामुळे शेतीच्या कामांना गती मिळाली असली, तरी कांदा उत्पादकांचे नुकसान चिंताजनक आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पावसाचा जोर पाहता येत्या काही दिवसांत आणखी पाऊस पडण्याची शयता आहे, त्यामुळे शेतकर्यांनी सावध राहावे, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.
मांडओहळ धरणात पाण्याची आवक सुरू
मांडओहळ धरण क्षेत्रातील सावरगाव काळेवाडी, पेमदरा, अणे, शिंदेवाडी, या परिसरात गेल्या आठ दिवसापासून दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पारनेर तालुयाच्या उत्तर भागाला वरदान असलेले मांड ओहोळ धरणामध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये समाधान आहे.
पिकांचे नुकसान, भरपाई मिळावी
गेल्या दहा-बारा दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा व टोमॅटो पीक अडचणीमध्ये आहे. पावसामुळे टोमॅटो पिकावर रोगराई वाढली आहे. सततच्या पावसाने टोमॅटो पीक धोयात आले आहे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी.
– दादाभाऊ झावरे (वासुंदे, शेतकरी)
सुप्यात पावसाची दमदार बॅटिंग ; पेरणीपूर्व मशागतीची कामे ठप्प
सुपा | नगर सह्याद्री
गेल्या आठ ते दहा दिवसांपासुन पारनेर तालुयात सातत्याने पाऊस पडत असुन रविवारी ही तालुयाच्या जवळजवळ सर्वच गावांनी चांगला पाऊस झाला आहे. रविवारी सकाळ पासुनच रिमझिम पाऊस पडत होता कधीमधी जोराच्या सरी कोसळत होत्या. रविवारी दिवसभर तालुयात सुर्य दर्शन झाले नाही. दुपारी साडे तीन चार नंतर पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली. चार वाजल्यानंतर जोराच्या पावसाला सुरुवात झाली. सुपा येथे सायंकाळी चार ते पाच या वेळेत जोराचा पाऊस होऊन सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. सुपा मेन चौक व बस स्थानकात पाणी शिरल्याने तळ्याचे स्वरूप आले होते.
रविवारी सायंकाळच्या पावसाने अहिल्यानगर पुणे महामार्ग व सुपा बस स्थानक परिसर पुर्ण जलमय झाला होता. महामार्गासह बस स्थानक चौकात गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे पाण्यातुन वाट काढताना वहान चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. तर सुपा बसस्थानक मोडकळीस आले असुन मोडया तोडया बस स्थानकात प्रवासी जीव मुठीत घेऊन उभे राहिलेले दिसत होते. नवीन बस स्थानकाचे बांधकाम लवकरात लवकर पुर्ण व्हावे अशी नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांची मागणी आहे.
तालुयात तीन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. नोकरदार, व्यावसायिक, कंपनी कामगार यांना भर पावसात ते – जा करावी लागली. तर गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पडत असलेल्या मान्सून पुर्व पावसाने शेतकर्यांची पेरणीपूर्व कामे ठप्प झाली आहेत.
अवकाळी पावसाने कांद्याचा चिखल ; पावसाने कांदा सडला, शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
मागील आठवड्यापासून श्रीगोंदा तालुयात मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली असून याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकर्यांना बसला आहे. या पावसामुळे शेतात साठवलेला उन्हाळी कांदा भिजून चिखल झाला. कांदा भिजून नासू लागला आहे. परिणामी, शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून मेहनतीबरोबरच केलेला आर्थिक खर्च पाण्यात गेल्याने शेतकर्यांचे डोळे पाणावले आहेत.
श्रीगोंदा तालुयात सरासरी ८१.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुयातील अनेक गावे कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, येथे बारा महिने कांद्याचे पीक घेतले जाते. उन्हाळी कांद्याला टिकाऊपणामुळे मोठी मागणी असते. कांदा उत्पादनासाठी शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. मात्र, मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतात साठवलेला कांदा भिजल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मंडलनिहाय पावसाची आकडेवारी पाहता, कोळगावमध्ये सर्वाधिक ३२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर पेडगाव – २८२ मिमी, बेलवंडी आणि मांडवगण – २७० मिमी, आढळगाव – २४७ मिमी, श्रीगोंदा – २३४ मिमी, काष्टी – २३१ मिमी, भानगाव – २१३ मिमी, चिंभळा – २०२ मिमी, लोणी व्यंकनाथ – १९० मिमी आणि देवदैठण – १४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.या अनिश्चित हवामानामुळे शेतकर्यांवर ओढवलेल्या संकटाची शासनाने गंभीर दखल घ्यावी आणि योग्य ती नुकसानभरपाई तत्काळ द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
नुकसान भरपाई देऊन शेतकर्यांचे दुःख कमी करावे ः शेतकरी
उन्हाळा कांदा लागवडीपासून काढणी साठवणूक यासाठी यंदा खर्च वाढला आहे. व यंदा सतत बदलत्या हवामानामुळे उत्पादनातही घट झाली आहे. त्यात कोसळत्या बाजार भावाने आर्थिक गणित बिघडवले. अवकाळी पावसाने कांदा भिजून शेतात चिखल झाला आहे. त्यातच साठवलेला कांदा भिजून खराब होऊ लागला आहे. त्यामुळे सरकारने कांद्याला योग्य भाव व नुकसान भरपाई देऊन शेतकर्याचे दुःख कमी करावे अशी मागणी घुगल वडगाव चे शेतकरी बाळू चव्हाण, चंद्रसेन बोराटे, सतीश पाडळे हे करीत आहे.