spot_img
आरोग्यHealth Tips : डायबेटिज असणाऱ्यांनी प्यावेत 'हे' ४ नैसर्गिक ड्रिंक्स ! होईल...

Health Tips : डायबेटिज असणाऱ्यांनी प्यावेत ‘हे’ ४ नैसर्गिक ड्रिंक्स ! होईल फायदा

spot_img

नगर सह्याद्री टीम ; डायबिटीज ज्यांना असतो त्यांच्यावर अनेकांना खाण्यापिण्याचे बंधने असतात. यावेळी अनेकदा शून्य-कॅलरी किंवा कमी-कॅलरी पेये पिण्याचा सल्ला दिला जातो. रक्तातील साखरेची वाढ रोखणे हा त्याचा मुख्य उद्देश असतो. तज्ञ सांगतात की, मधुमेही रुग्ण त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही नैसर्गिक पेये पिऊ शकतात. ती कोणती आहेत याबद्दल जाणून घेऊयात –

1. पाणी
जेव्हा हायड्रेशनचा विचार केला जातो, तेव्हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू देत नाही. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज लघवीद्वारे काढून टाकण्यास मदत होते. एका प्रौढ पुरुषाने दिवसातून सुमारे 3.08 लिटर पाणी प्यावे आणि महिलांनी दिवसातून सुमारे 2.13 लिटर पाणी प्यावे.

2. ग्रीन टी
अनेक संशोधकांमध्ये हे सिद्ध झाले आहे की ग्रीन टीचा तुमच्या सामान्य आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ग्रीन टीचे दररोज सेवन केल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांचे आरोग्य सुधारते.

3. गोड नसणारी कॉफी
कॉफी पिल्याने साखरेचे चयापचय सुधारते आणि टाइप २ मधुमेह होण्याचा धोका कमी होण्यासही मदत होऊ शकते. त्यात थोडीशीही साखर न घालता ती पिल्यास नक्कीच फायदा होतो असे तज्ज्ञ म्हणतात.

4. लिंबू पाणी
लिंबूपाणी हे एक नैसर्गिक पेय आहे जे घरी सहज तयार केले जाऊ शकते, तथापि, लक्षात ठेवा की त्यात साखरेचे प्रमाण शून्य असावे

टीप : वरील माहिती ज्ञानावर आधारित आहे. वैद्यकीय सल्ला घ्यावा

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...