spot_img
अहमदनगरमाध्यमे 'एकतर्फी' झाली की काय? 'त्या' जाहिरातबाजीचा लोकांना कंटाळा! आमदार थोरात यांनी...

माध्यमे ‘एकतर्फी’ झाली की काय? ‘त्या’ जाहिरातबाजीचा लोकांना कंटाळा! आमदार थोरात यांनी स्पष्टच मांडले मत

spot_img

संगमनेर। नगर सहयाद्री
देशात वाढलेली महागाई व बेरोजगारी, याचबरोबर महिलांचे, शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. मात्र यावर सरकार बोलत नसून धार्मिकतेचे मुद्दे पुढे केले जात आहेत. राज्यातील आणि केंद्रातील सरकार गोंधळलेले आहे. सर्व क्षेत्रात अपयशी ठरत आहे. मात्र मीडिया शांत बसून आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मीडिया बोलायला तयार नाही. त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. माध्यमे एकतर्फी झाली की काय? अशी शंका देशाला निर्माण होत असून भाजपाच्या फसव्या जाहिरातबाजीला लोक कंटाळले असल्याचे मत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मांडले.

अमृता लॉन्स येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियोजनाची बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा. आमदार डॉ सुधीर तांबे, शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, कॉम्रेड डॉ. अजित नवले, हेमंत ओगले, डॉ एकनाथ गोंदकर, श्रीकांत मापारी, करण ससाने, शिवाजी नेहे, सुनीता भांगरे ,मधुकर तळपाडे ,शिवसेनेचे जगदीश चौधरी, संजय फड, आप्पासाहेब केसकर, सुधीर म्हस्के, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, बाबा ओहोळ, इंद्रजीत थोरात, रणजीत सिंह देशमुख आदींसह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले, देशात इंडिया आघाडीला आणि राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. सर्वत्र वाढलेली बेरोजगारी व महागाई हे महत्त्वाचे मुद्दे आहे. मात्र यावर सरकार बोलत नाही. धार्मिकतेचे मुद्दे पुढे केले जात आहे. फसव्या जाहिरातींमधून दिशाभूल होत आहे. आता जनता याचा लोकांना कंटाळा आला आहे.महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार असून अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत चांगले वातावरण आहे. आपसातील मतभेद दूर करून सर्वांनी एक महिन्याभर अत्यंत चांगले नियोजन करा.

सध्याच्या सरकार विरोधात कमीत कमी प्रत्येकाला 100 मुद्दे सापडतील. राज्यातील आणि केंद्रातील सरकार गोंधळलेले आहे. सर्व क्षेत्रात अपयशी ठरत आहे. मात्र मीडिया शांत बसून आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मीडिया बोलायला तयार नाही. त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. माध्यमे एकतर्फी झाली की काय अशी शंका देशाला निर्माण होत आहे. राज्यघटनेचा आणि सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचा महाविकास आघाडीचा विचार घराघरात पोहोचवा यश आपलेच आहे असेही ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...