spot_img
ब्रेकिंगराजकारणात पुन्हा भूकंप होणार? हादरे (शिवसेना) शिंदे गटाला बसणार, 'त्या' दाव्यांने पुन्हा...

राजकारणात पुन्हा भूकंप होणार? हादरे (शिवसेना) शिंदे गटाला बसणार, ‘त्या’ दाव्यांने पुन्हा ट्विस्ट

spot_img

मुंबई। नगर सह्याद्री-
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्वच पक्ष आपापले उमेदवार घोषित करू लागले आहेत. महाराष्ट्रचे राजकीय वातावरण तापले असून अनेक खासदारांचा लोकसभा निवडणुकीत पत्ता कट झालाय. यावरून विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे.

भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे पक्ष महायुती म्हणून लढत आहेत. तर शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्वच पक्ष आपापले उमेदवार घोषित करू लागले असून अनेक खासदारांचा लोकसभा निवडणुकीत पत्ता कट करण्यात आला आहे. तापलेल्या राजकीय वातावरणात पुन्हा कंप होण्याची शक्यता असून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी (शिवसेना) शिंदे गटाला हादरे बसणार असा दावाच केला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले काय?
काँग्रेसला प्रचंड अनुकूल अशी परिस्थिती आहे. पहिल्या टप्प्यातील पाचही ठिकाणी जनता काँग्रेसच्या बाजूने कौल देईल. विद्यमान सरकारच्या बाबतीत लोकांच्या मनात राग आणि चीड आहे. शिंदेंच्या 7 खासदारांची काय गती झाली. उद्धव ठाकरे भेटत नव्हते म्हणणाऱ्यांना आता जागाही भेटत नाही, निम्मे खासदार उद्धव ठाकरेंशी संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ! हत्या की आत्महत्या? पती-पत्नीचा ‘तसल्या’ अवस्थेत आढळला मृतदेह..

राहाता । नगर सहयाद्री:- राहाता तालुक्यातील गोगलगाव (ता. राहाता) येथे गुरुवारी एका पती-पत्नीचा संशयास्पद...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना’अच्छे’ दिन? वाचा, भविष्य..

मुंबई / नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल-त्यामुळे तुमच्या कुटुंबातील...

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...