spot_img
ब्रेकिंगगुलालच!! सर्व मागण्या मान्य? मराठा समाजाचा आनंदोत्सव, जरांगे पाटील म्हणाले, अत्ता..?

गुलालच!! सर्व मागण्या मान्य? मराठा समाजाचा आनंदोत्सव, जरांगे पाटील म्हणाले, अत्ता..?

spot_img

नवी मुंबई। नगर सहयाद्री
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पित आपले उपोषण मागे घेतले आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची कुणबी नोंदी आणि सगेसोयरे या बाबतची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. राज्य सरकारने सगेसोयरे म्हणून कुणाला लाभ देता येईल या संदर्भातील राजपत्र प्रकाशित केले आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारने ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या सगेसोयर्‍यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावीत, अशी मागणी केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर शिंदे यांनी जरांगे यांना ज्यूस दिल्यानंतर जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतल्याची अधिकृत घोषणा केली. यावेळी भाजपकडून गिरीश महाजन उपस्थित होते.

जालन्यातील आंतरवाली सराटी येथून २० जानेवारीपासून मोर्चा काढला होता. मनोज जरांगे यांचा मोर्चा नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होताच राज्य सरकारने त्यांची मागणी मान्य केली. राज्य सरकारने यासंदर्भात एक राजपत्र प्रकाशित केले आहे. राजपत्रातून जारी केलेला मसुदा १६ फेब्रुवारी २०२४ पासून विचारात घेण्यात येईल असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपस्थित मराठा समाजाला संबोधित केले. कुणबी नोंदींच्या आधारे सगेसोयर्‍यांना जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील राजपत्र मुख्यंमत्र्यांनी जरांगे यांच्याकडे दिले. यावेळी जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे विविध मागण्या केल्या. न्या. शिंदे समितीला देखील मुदतवाढ द्यावी, अशी मागणी जरांगे यांनी केली.

जरांगे म्हणाले, मराठा समाजाच्या ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या. त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या त्यांच्या सगेसोयर्‍यांना जातप्रमाणपत्र मिळावे. माझ्या मराठ्यांनी आरक्षणासाठी संघर्ष केला. ३०० पेक्षा अधिक मुलांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहे. मराठा आरक्षणासाठी अनेक घरांतील कर्ता पुरुष गेलेला आहे. ज्यांची नोंद मिळाली त्यांची गृहचौकशी न करता जात प्रमाणपत्र वाटप करावीत. आंतरवाली सराटीतील गुन्हे मागे घेतले जावेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाने उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नये. हैदराबादचे १८८४ चे गॅझेट लागू करावे.

मराठ्यांना दिलेली शपथ पूर्ण केली ः मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे
मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांची वाशी येथे भेट घेतली. ज्यूस दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा शब्द देतानाच मी मराठ्यांना दिलेली शपथ पूर्ण केली, असा दावाही केला.

अध्यादेश टिकविण्याची जबाबदारी सरकारची
ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्राबाबतचा अध्यादेश सरकारकडून काढला आहे. तसेच सगेसोयर्‍यांनाही प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याबाद्दल जरांगे यांनी सरकारचे आभार मानले. आभार मानतानाच ‘मराठा आरक्षणाचा जो अध्यादेश काढण्यात आला, तो अध्यादेश टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे’ याची आठवणही जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली.

आरक्षणाच्या अध्यादेशानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. जरांगे यांच्या मोर्चाविरूद्ध अ‍ॅड. सदावर्ते न्यायालयात गेले होते. मध्यंतरी जरांगे-सदावर्ते यांच्यात आरोप-प्रत्यारोपही वाढले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने ही काळजी घेतली आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर वकील सदावर्ते यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाच्या हाती येणार? सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना पक्षाच्या नावावरून...

साहेब! सांगा कचरा टाकू कुठे? ‘या’ भागातील महिलांचा सवाल, वाचा आयुक्त डांगे यांचे उत्तर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून शहरातील...

खळबळजनक आरोप: ‘आरएसएसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडला संपवण्याची योजना’

प्रवीण गायकवाड यांचा दीपक काटेला तुरुंगात सुविधा पुरवणार असल्याचा आरोप मुंबई । नगर सहयाद्री:- गेल्या...

नगरमधून अपहरण, आळंदीत अत्याचार; वारकरी शिक्षण संस्थेत चाललंय काय? महिला कीर्तनकारासह..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पुण्याच्या आळंदी येथे धक्कादाय प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर येथून...