spot_img
ब्रेकिंगनागरिकांमध्ये मोठी नाराजी; 'त्या' रस्त्यावर अवैध व्यवसाय करणाऱ्या महिला, कडक कारवाई होणार?

नागरिकांमध्ये मोठी नाराजी; ‘त्या’ रस्त्यावर अवैध व्यवसाय करणाऱ्या महिला, कडक कारवाई होणार?

spot_img

Maharashtra News: आळंदी पुणे रस्त्यावरील वाढते हॉटेल-लॉज आणि अवैध व्यवसाय करणाऱ्या महिला परिसरात दिसत असल्याने नागरिकांतून मोठी नाराजी आहे. अवैध व्यवसाय करत असल्याचे परिसरात आढळून आल्यास संबंधित हॉटेल, लॉजचे मालक, चालक, व्यवस्थापक तसेच या संदर्भात जे जे संबंधित दिसतील त्या सर्वावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देत कठोर कारवाईचे सूचना निर्देश पिंपरी पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ तीनचे उपायुक्त ( डीसीपी ) डॉ. शिवाजी पवार यांनी बैठकीत दिले.

आळंदी पुणे रस्त्यावरील दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लॉज व हॉटेल मालक, चालक, व्यवस्थापक यांची बैठक पिंपरी पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ तीनचे उपायुक्त ( डीसीपी ) डॉ. शिवाजी पवार यांनी घेतली. या बैठकीस दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे, पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवींद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक जाधव, अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीत बैठक झाली.

या बैठकीत हद्दीतील लॉज, हॉटेल व्यावसायिक देखील उपस्थिती होते. या बैठकीत परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा खणखणीत इशारा देण्यात आला. आळंदी परिसराचे पावित्र्य जोपासण्यासाठी सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले. लॉज व हॉटेल मालक, चालक, व्यवस्थापक यांची यावेळी उपस्थिती होती. या बैठकी मुळे परिसरात हॉटेल, लॉज चालक, मालक, व्यवस्थापकाचे धाबे दणाणले असून या बैठकीची अनेकांनी धास्ती घेतली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे यांनी या बैठकीचे आयोजन करीत बैठकीत आढळून येणाऱ्या संबंधित दोषींवर किशोर कारवाई केली जाईल असे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...