spot_img
ब्रेकिंगतरुणांसाठी खुशखबर! शिंदे सरकारची मोठी घोषणा; ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

तरुणांसाठी खुशखबर! शिंदे सरकारची मोठी घोषणा; ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र शासनाने बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी भरती योजना जाहीर केली आहे. राज्यभरातील गावांमध्ये योजनादूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या अंतर्गत ५०,००० पदांवर भरती केली जाईल. योजनादूत म्हणून निवडलेल्या व्यक्तींना दरमहा १०,००० रुपये मानधन दिले जाईल. नियुक्तीचा कालावधी ६ महिने असेल आणि यानंतर त्यांना शासनाकडून प्रमाणपत्रही प्राप्त होईल.

योजनादूत म्हणजे काय?

योजनादूत हे एक महत्त्वाचे पद असून, यासाठी निवडलेले उमेदवार राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणार आहेत. त्यांनी लोकांना योजना वापरण्याच्या पद्धती आणि योजनेचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.

आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. रहिवासी दाखला
३. पदवी प्रमाणपत्र
४. संगणक प्रमाणपत्र (MSCIT)

अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी mahayojanadoot.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख
योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर २०२४ आहे.
अधिक माहिती आणि अर्जासाठी संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ट्रॅक्टरच्या टायरमध्ये का भरलं जात पाणी? अनेकांना पडलेला महत्वाचा प्रश्न, वाचा त्यामागचं कारण

मुंबई । नगर सहयाद्री:- आपण इतर वाहनांच्या टायरमध्ये हवा भरतो, पण ट्रॅक्टरच्या टायरमध्ये हवेऐवजी...

बाप रे! बर्फाच्या कारखान्यात धक्कादायक प्रकार; कामगाराच्या डोक्यात ‘इतके’ टाके

जामखेड । नगर सहयाद्री:- जामखेड येथे बर्फ कारखान्यात गेल्या आठ वर्षापासून कामाला असलेल्या परप्रांतीय...

मेहुणीला करायचं होतं भाऊजीला खूश, पुढे घडलं असं काही….

Crime News : सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही स्तरावर जाऊन...

अजबच! ‘सिबिल स्कोअर’ खराब असल्याने मोडलं लग्न..

Maharashtra News: सामान्य ग्राहकाला कर्ज देताना बँका त्या ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेसोबतच त्याच्या ‘सिबिल स्कोअर’चासुद्धा...