spot_img
ब्रेकिंगतरुणांसाठी खुशखबर! शिंदे सरकारची मोठी घोषणा; ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

तरुणांसाठी खुशखबर! शिंदे सरकारची मोठी घोषणा; ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र शासनाने बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी भरती योजना जाहीर केली आहे. राज्यभरातील गावांमध्ये योजनादूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या अंतर्गत ५०,००० पदांवर भरती केली जाईल. योजनादूत म्हणून निवडलेल्या व्यक्तींना दरमहा १०,००० रुपये मानधन दिले जाईल. नियुक्तीचा कालावधी ६ महिने असेल आणि यानंतर त्यांना शासनाकडून प्रमाणपत्रही प्राप्त होईल.

योजनादूत म्हणजे काय?

योजनादूत हे एक महत्त्वाचे पद असून, यासाठी निवडलेले उमेदवार राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणार आहेत. त्यांनी लोकांना योजना वापरण्याच्या पद्धती आणि योजनेचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.

आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. रहिवासी दाखला
३. पदवी प्रमाणपत्र
४. संगणक प्रमाणपत्र (MSCIT)

अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी mahayojanadoot.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख
योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर २०२४ आहे.
अधिक माहिती आणि अर्जासाठी संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगर शहर महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छ राहावे, यासाठी स्वच्छताविषयक विविध कार्यक्रम...

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात ‘या’ धार्मिक स्थळी पिंड दान करा; पितरांना मिळतो मोक्ष आणि नाहीसा होतो पितृदोष

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो आणि पितृदोष दूर...

politics news: पराभवाचा वचपा काढण्यासाठी कर्डीले सज्ज? राहुरीत कर्डिले विरुद्ध तनपुरेच!

अहमदनगर । नगर सहयाद्री :- लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात...

ठरलं! उमेदवारांची पहिली यादी ‘या’ तारखेला जाहीर होणार? भाजप किती जागा लढवणार?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद...