spot_img
ब्रेकिंगतरुणांसाठी खुशखबर! शिंदे सरकारची मोठी घोषणा; ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

तरुणांसाठी खुशखबर! शिंदे सरकारची मोठी घोषणा; ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र शासनाने बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी भरती योजना जाहीर केली आहे. राज्यभरातील गावांमध्ये योजनादूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या अंतर्गत ५०,००० पदांवर भरती केली जाईल. योजनादूत म्हणून निवडलेल्या व्यक्तींना दरमहा १०,००० रुपये मानधन दिले जाईल. नियुक्तीचा कालावधी ६ महिने असेल आणि यानंतर त्यांना शासनाकडून प्रमाणपत्रही प्राप्त होईल.

योजनादूत म्हणजे काय?

योजनादूत हे एक महत्त्वाचे पद असून, यासाठी निवडलेले उमेदवार राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणार आहेत. त्यांनी लोकांना योजना वापरण्याच्या पद्धती आणि योजनेचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.

आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. रहिवासी दाखला
३. पदवी प्रमाणपत्र
४. संगणक प्रमाणपत्र (MSCIT)

अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी mahayojanadoot.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख
योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर २०२४ आहे.
अधिक माहिती आणि अर्जासाठी संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर: शिक्षक बनला भक्षक! प्रयोगशाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील एका नामांकित पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर...

कस्टमर केअरला कॉल करणं महागात पडलं!, ४ लाख ६६ हजार खात्यातून लंपास, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ऑनलाइन खाद्य वितरण अ‍ॅपवरून ऑर्डर केल्यानंतर ती न मिळाल्याने गुगलवर...

मला तुझ्या नवऱ्याच्या जागेवर धर!: विधवा वहिनीचा दिराने केला छळ, पारनेर तालुक्यातील प्रकार

पारनेर । नगर सहयाद्री विधवा महिलेच्या दीराने भररस्त्यात मारहाण करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार...

मेंढपाळाच्या १० बकऱ्या ठार! पारनेर तालुक्यात बिबट्याचा कुटुंबासह तळ

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील पाडळी आळे शिवारात रविवारी (१४ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता...