spot_img
ब्रेकिंगतरुणांसाठी खुशखबर! शिंदे सरकारची मोठी घोषणा; ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

तरुणांसाठी खुशखबर! शिंदे सरकारची मोठी घोषणा; ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र शासनाने बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी भरती योजना जाहीर केली आहे. राज्यभरातील गावांमध्ये योजनादूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या अंतर्गत ५०,००० पदांवर भरती केली जाईल. योजनादूत म्हणून निवडलेल्या व्यक्तींना दरमहा १०,००० रुपये मानधन दिले जाईल. नियुक्तीचा कालावधी ६ महिने असेल आणि यानंतर त्यांना शासनाकडून प्रमाणपत्रही प्राप्त होईल.

योजनादूत म्हणजे काय?

योजनादूत हे एक महत्त्वाचे पद असून, यासाठी निवडलेले उमेदवार राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणार आहेत. त्यांनी लोकांना योजना वापरण्याच्या पद्धती आणि योजनेचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.

आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. रहिवासी दाखला
३. पदवी प्रमाणपत्र
४. संगणक प्रमाणपत्र (MSCIT)

अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी mahayojanadoot.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख
योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर २०२४ आहे.
अधिक माहिती आणि अर्जासाठी संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये गुटख्याची वाहतूक करणारी टोळी पकडली!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- गुटख्याची वाहतूक करणार्‍या टोळीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष...

वारकऱ्याला काठीने मारहाण; पंढरीत नेमकं काय घडलं?

Maharashtra News: आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांमध्ये आज सकाळी मोठी खळबळ उडाली, जेव्हा...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या जातकांना संकटांचा सामना करावा लागणार?

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

प्रति पंढरपूर पळशी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध : सुजित झावरे पाटील

आषाढी एकादशी निमित्त आरती व महापूजा; भाविकांची अलोट गर्दी/ पारनेर पोलीस प्रशासनाचा पळशी येथे...