spot_img
ब्रेकिंगशेतकऱ्यांना खुशखबर! जिल्हा बँकेचा मोठा निर्णय? चेअरमन कर्डीले म्हणाले, शेतकरी सभासदांना..

शेतकऱ्यांना खुशखबर! जिल्हा बँकेचा मोठा निर्णय? चेअरमन कर्डीले म्हणाले, शेतकरी सभासदांना..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद प्राथमिक वि.का. सेवा सहकारी संस्थांनी ज्या पिक कर्जदार सभासदांकडील नियमित पिक कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदाकडील रू. ३.०० लाखापर्यतचे कर्जावरील दिनांक ०१/०३/२०२४ ते दि.३१/३/२०२४ पर्यंत वसुल केलेले व शासनाच्या व्याज परताव्याच्या धोरणा प्रमाणे सन २०२३-२०२४ चे व्याज परताव्यास पात्र असलेले कर्जदार शेतकरी सभासदांना परत करण्याचा बँकेने निर्णय घेतला होता त्या पध्दतीने जिल्हयातील बहुतांश कर्जदार शेतकरी सभासदांना वसुल व्याज बँकेने परत केले असुन आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दिनांक १ एप्रिल २०२३ ते दि.३१ मार्च २०२४ पर्यंत पिक कर्ज वसुल व्याजही कर्जदार शेतकऱ्यांना परत करण्याचा महत्वपुर्ण निर्णय जिल्हा बँकेच्या आज झालेल्या कार्यकारी कमिटीचे सभेत घेण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी दिली.

बँकेने दिनांक १/३/२०२४ ते दि.३१/३/२०२४ पर्यंतचे पिक कर्ज वसुल व्याज परत पिक कर्जदार शेतकरी सभासदांना देण्याचे निर्णयानुसार जिल्ह्यातील १५४८४० शेतकऱ्यांना रक्कम रू.७३ कोटी ८५ लाख रक्कम संबंधीत सोसायटीच्या करंट खाती बँकेने जमा केली आहे.त्यापैकी ७४३९१ सभासदांचे सेव्हिंग्ज खाती रक्कम रू ३७ कोटी ६१ लाख वसुल व्याज जमा केले आहे. उर्वरीत शेतकरी सभासदांनी आपली हमीपत्र संबंधीत सेवा सहकारी संस्था व शाखेस सादर करून त्यांनी आपले वसुल व्याज परत घ्यावे असे आवाहन बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी केले.

१ एप्रिल २०२३ पासुन पिक कर्ज वसुल व्याज परत करण्याच्या निर्णयामुळे जिल्हयातील कोणताही शेतकरी यापासुन वंचित राहाणार नसुन जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटयांनी आता १ एप्रिल २०२३ पासुनचे वसुल पिक कर्जावरील वसुल व्याज परत करण्याचे प्रस्ताव सोसायट्यांनी बँकेच्या संलग्न शाखेत त्वरीत सादर करून शेतकरी सभासदांचे वसुल व्याज लवकरात लवकर व्याज परत करण्याच्या दृष्टीने सोसायट्यांनी अंमलबजावणी करावी. बँकेने जिल्हयातील विविध कार्यकारी सेवा सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरीता १७९९९० शेतकरी सभासदांना रू. १३८० कोटी ५६ लाखाचे नविन पिक कर्ज वाटप केले असुन बँकेकडून शेतकऱ्यांना त्वरीत कर्ज वाटपाचे कामकाज केले जात असल्याचे देखील ते म्हणाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...

पुणे, कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये आ. जगताप अलर्ट; आयुक्तांना पत्र देत तातडीने केली ‘ही’ मागणी

अहमदनगर / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंंबई, कोल्हापूर येथे पावसामुळे पूर...

‘ज्याला तडीपार केले त्यांच्या हातात गृहमंत्रीपद दिले’ शरद पवार यांचा अमित शाह यांच्यावर पलटवार

छ.संभाजी नगर । नगर सहयाद्री:- माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशाचे...

अहमदनगरच्या ‘या’ गावात धाडसी दरोडा! चोरीत चोरटे निघाले हुशार? नेमकं काय घडलं…

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील भिमा व घोडनदीच्या संगमावर असणार्या सांगवी दुमाला परिसरामध्ये धाडसी...