spot_img
अहमदनगरशेतकऱ्यांसाठी खुशखबर ! अहमदनगरसह 'या' पाच बाजार समित्यांबाबत शासनाने घेतला महत्वाचा निर्णय

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! अहमदनगरसह ‘या’ पाच बाजार समित्यांबाबत शासनाने घेतला महत्वाचा निर्णय

spot_img

अहमदनगर / नगरसह्याद्री : माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखालील समिती खासगी बाजाराच्या धर्तीवर मुंबई एपीएमसीसह पाच बाजार समित्यांचा अभ्यास करणार आहे. या समितीत आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह पुणे, नाशिक, अहमदनगर आणि नागपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश केला आहे. ही समिती येत्या महिनाभरात आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव भेटण्यास मदत होईल.

व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी व शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी सहकार विभागाने थेट विपणन व खाजगी बाजार आवारांसह कंत्राटी शेती व इलेक्ट्रॉनिक व्यापारासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मात्र, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. हे समोर आल्यावर सहकार विभागाने १३ सप्टेंबर २०२३ रोजी एक समिती स्थापन केली होती.

राज्यातील पाच बाजार समित्यांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये बाजार समित्या, खासगी व कंत्राटी बाजार व्यवस्थेतील यंत्रणा, शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव कसा देता येईल, याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. येत्या महिनाभरात अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितलं आहे.

माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखालील समितीला 75 दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या समितीत पणन सचिव, संचालकांसह औरंगाबाद, नाशिक, विदर्भातील शेतकरी प्रतिनिधी, व्यापार्‍यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. दांगट यांची समिती मुंबई एपीएमसीसह पुणे, नाशिक, अहमदनगर आणि नागपूर या बाजार समित्यांचा अभ्यास करणार आहे. येत्या महिनाभरात हा अभ्यास पूर्ण होवून राज्य सरकारला आपला अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Parner: खासदार विखे शेतकऱ्यांच्या बांधावर! म्हणाले, शेतकऱ्यांना..

पारनेर। नगर सह्याद्री- तालुक्यातील महसूल व कृषी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करताना कोणत्याही अडचणी येऊ...

Ahmednagar: सैनिकाला मारहाण..; नगरच्या ‘या’ भागात ‘धक्कादायक’ प्रकार

अहमदनगर | नगर सह्याद्री- सैनिकाच्या पत्नी विषयी समाजात वाईट बोलून त्यांची बदनामी केली. याबाबत जाब...

‘महसूलमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातुन तीन कोटी निधी’

सागर मैड यांची पत्रकार परिषदेत माहिती सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील सुपा गावात येत्या काळात...

…म्हणून प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना महत्व, जाणून घ्या सविस्तर

नगर सहयाद्री टीम- प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना फार महत्व दिले जात होते. बाजारात चककणारी व...