spot_img
अहमदनगरशेतकऱ्यांना खुशखबर ! तब्बल 'इतका' पीकविमा मंजूर

शेतकऱ्यांना खुशखबर ! तब्बल ‘इतका’ पीकविमा मंजूर

spot_img

संगमनेर। नगर सहयाद्री-

महायुती सरकारने सुरु केलेल्‍या एक रुपयात पीक विमा योजनेचा मोठा दिलासा तालुक्‍यातील शेतक-यांना मिळाला असून, यावर्षी या विमा योजनेत सहभागी झालेल्‍या सुमारे ४४ हजार ५४७ शेतकरी लाभार्थ्‍यांना अग्रीम रक्‍कमेपोटी सुमारे २५ कोटी ६५ लाख रुपये मंजुर झाले असल्‍याची माहीती महसुल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

खरीप हंगामाच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍य सरकारने एक रुपयात पीक विमा योजना शेतक-यांसाठी सुरु केली होती. अशा पध्‍दतीची योजना सुरु करणारे महाराष्‍ट्र राज्‍य हे देशात एकमेव ठरले. या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. नगर जिल्‍ह्यातही सुमारे साडे अकरा लाख शेतक-यांनी या योजनेत प्रत्‍यक्ष सहभाग नोंदविला.

संगमनेर तालुक्‍यात २०२३ मध्‍ये सुरु झालेल्या पी‍कविमा योजनेत एकुण ८४ हजार ९२६ शेतक-यांनी सहभाग नोंदविला आहे. यापैकी ४४ हजार ५४७ लाभार्थ्‍यांना २५ कोटी ६५ लाख ६२ हजार रुपयांची अग्रीम रक्‍कम मंजुर झाली असल्‍याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.

यापुर्वी सुरु असलेल्‍या पीकविमा योजनेमध्‍ये मोठ्या प्रमाणात प्रश्‍न उपस्थित झाल्‍याने कंपन्‍याकडून पी‍कविम्‍याचा कोणताही लाभ शेतक-यांना होवू शकला नाही. राज्‍यात युती सरकार आल्‍यानंतर शेतक-यांवर कोणताही आर्थिक भुर्दंड येवू न देता राज्‍य सरकारनेच एक रुपयात पी‍क‍विमा योजनेची अंमलबजावणी स्‍वत:हून केली.

यापुर्वी संगमनेर तालुक्‍यात २०२२ सालच्‍या योजनेमध्‍ये अवघे ५ हजार २२५ शेतकरी सहभागी झाले होते. त्‍यांना केवळ १ कोटी ४६ लाख ३६ हजार रुपयांच्‍या पिक विम्‍याचा लाभ मिळू शकता. आता राज्‍य सरकारनेच योजना सुरु केल्‍यामुळे ४४ हजार ५४७ शेतकरी या योजनेत सहभागी होवू शकले हे या योजनेचे वैशिष्‍ट्य ठरले असल्‍याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मान्सूनची पुन्हा गर्जना; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon:वेळेआधीच दाखल मान्सूनने यंत्रणांची पोलखोल केली आणि मान्सून पुन्हा गायब झाला.. मात्र 3...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या लोकांनी सावध रहा, तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी...

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...