spot_img
अहमदनगरशेतकऱ्यांना खुशखबर ! तब्बल 'इतका' पीकविमा मंजूर

शेतकऱ्यांना खुशखबर ! तब्बल ‘इतका’ पीकविमा मंजूर

spot_img

संगमनेर। नगर सहयाद्री-

महायुती सरकारने सुरु केलेल्‍या एक रुपयात पीक विमा योजनेचा मोठा दिलासा तालुक्‍यातील शेतक-यांना मिळाला असून, यावर्षी या विमा योजनेत सहभागी झालेल्‍या सुमारे ४४ हजार ५४७ शेतकरी लाभार्थ्‍यांना अग्रीम रक्‍कमेपोटी सुमारे २५ कोटी ६५ लाख रुपये मंजुर झाले असल्‍याची माहीती महसुल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

खरीप हंगामाच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍य सरकारने एक रुपयात पीक विमा योजना शेतक-यांसाठी सुरु केली होती. अशा पध्‍दतीची योजना सुरु करणारे महाराष्‍ट्र राज्‍य हे देशात एकमेव ठरले. या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. नगर जिल्‍ह्यातही सुमारे साडे अकरा लाख शेतक-यांनी या योजनेत प्रत्‍यक्ष सहभाग नोंदविला.

संगमनेर तालुक्‍यात २०२३ मध्‍ये सुरु झालेल्या पी‍कविमा योजनेत एकुण ८४ हजार ९२६ शेतक-यांनी सहभाग नोंदविला आहे. यापैकी ४४ हजार ५४७ लाभार्थ्‍यांना २५ कोटी ६५ लाख ६२ हजार रुपयांची अग्रीम रक्‍कम मंजुर झाली असल्‍याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.

यापुर्वी सुरु असलेल्‍या पीकविमा योजनेमध्‍ये मोठ्या प्रमाणात प्रश्‍न उपस्थित झाल्‍याने कंपन्‍याकडून पी‍कविम्‍याचा कोणताही लाभ शेतक-यांना होवू शकला नाही. राज्‍यात युती सरकार आल्‍यानंतर शेतक-यांवर कोणताही आर्थिक भुर्दंड येवू न देता राज्‍य सरकारनेच एक रुपयात पी‍क‍विमा योजनेची अंमलबजावणी स्‍वत:हून केली.

यापुर्वी संगमनेर तालुक्‍यात २०२२ सालच्‍या योजनेमध्‍ये अवघे ५ हजार २२५ शेतकरी सहभागी झाले होते. त्‍यांना केवळ १ कोटी ४६ लाख ३६ हजार रुपयांच्‍या पिक विम्‍याचा लाभ मिळू शकता. आता राज्‍य सरकारनेच योजना सुरु केल्‍यामुळे ४४ हजार ५४७ शेतकरी या योजनेत सहभागी होवू शकले हे या योजनेचे वैशिष्‍ट्य ठरले असल्‍याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गँगस्टर छोटा राजनचा साथीदारस बेड्या; ‘असा’ अडकला जाळ्यात

मुंबई ।नगर सहयाद्री:- गँगस्टर छोटा राजनचा जवळचा साथीदार कुख्यात गुंड डीके रावला अटक करण्यात...

श्रीरामपुरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे; तीन महिन्यात तीन गोळीबार!

श्रीरामपुर । नगर सहयाद्री:- निवृत्ती नंतर सुखी, सुरक्षित राहण्यासाठी नावलौकिक असलेल्या श्रीरामपूर शहरात काय...

सैफवरील हल्ला संशयास्पद! मंत्री नितेश राणेंची शंका; अजितदादा काय म्हणाले?

पुणे नगर सहयाद्री:- अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ल्या झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती....

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ३१ जानेवारीपर्यंत ‘हे’ काम करा; अन्यथा लाभ मिळणार नाही?

PM Kisan Yojana: केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी असलेली महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी...