spot_img
अहमदनगरशेतकऱ्यांना खुशखबर ! तब्बल 'इतका' पीकविमा मंजूर

शेतकऱ्यांना खुशखबर ! तब्बल ‘इतका’ पीकविमा मंजूर

spot_img

संगमनेर। नगर सहयाद्री-

महायुती सरकारने सुरु केलेल्‍या एक रुपयात पीक विमा योजनेचा मोठा दिलासा तालुक्‍यातील शेतक-यांना मिळाला असून, यावर्षी या विमा योजनेत सहभागी झालेल्‍या सुमारे ४४ हजार ५४७ शेतकरी लाभार्थ्‍यांना अग्रीम रक्‍कमेपोटी सुमारे २५ कोटी ६५ लाख रुपये मंजुर झाले असल्‍याची माहीती महसुल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

खरीप हंगामाच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍य सरकारने एक रुपयात पीक विमा योजना शेतक-यांसाठी सुरु केली होती. अशा पध्‍दतीची योजना सुरु करणारे महाराष्‍ट्र राज्‍य हे देशात एकमेव ठरले. या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. नगर जिल्‍ह्यातही सुमारे साडे अकरा लाख शेतक-यांनी या योजनेत प्रत्‍यक्ष सहभाग नोंदविला.

संगमनेर तालुक्‍यात २०२३ मध्‍ये सुरु झालेल्या पी‍कविमा योजनेत एकुण ८४ हजार ९२६ शेतक-यांनी सहभाग नोंदविला आहे. यापैकी ४४ हजार ५४७ लाभार्थ्‍यांना २५ कोटी ६५ लाख ६२ हजार रुपयांची अग्रीम रक्‍कम मंजुर झाली असल्‍याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.

यापुर्वी सुरु असलेल्‍या पीकविमा योजनेमध्‍ये मोठ्या प्रमाणात प्रश्‍न उपस्थित झाल्‍याने कंपन्‍याकडून पी‍कविम्‍याचा कोणताही लाभ शेतक-यांना होवू शकला नाही. राज्‍यात युती सरकार आल्‍यानंतर शेतक-यांवर कोणताही आर्थिक भुर्दंड येवू न देता राज्‍य सरकारनेच एक रुपयात पी‍क‍विमा योजनेची अंमलबजावणी स्‍वत:हून केली.

यापुर्वी संगमनेर तालुक्‍यात २०२२ सालच्‍या योजनेमध्‍ये अवघे ५ हजार २२५ शेतकरी सहभागी झाले होते. त्‍यांना केवळ १ कोटी ४६ लाख ३६ हजार रुपयांच्‍या पिक विम्‍याचा लाभ मिळू शकता. आता राज्‍य सरकारनेच योजना सुरु केल्‍यामुळे ४४ हजार ५४७ शेतकरी या योजनेत सहभागी होवू शकले हे या योजनेचे वैशिष्‍ट्य ठरले असल्‍याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...