spot_img
अहमदनगरAhmednagar: बळीराजाला खुशखबर!! ‘या’ योजनेच्‍या माध्‍यमातून ४ कोटी ७१ लाख मंजुर

Ahmednagar: बळीराजाला खुशखबर!! ‘या’ योजनेच्‍या माध्‍यमातून ४ कोटी ७१ लाख मंजुर

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील मदती करीता दाखल झालेल्‍या प्रलंबित प्रस्‍तावांना मंजुरी मिळाली असून, नगर जिल्‍ह्यातील २४१ शेतक-यांना या योजनेच्‍या माध्‍यमातून ४ कोटी ७१ लाख रुपयांची रक्‍कम मंजुर झाली असल्‍याची माहीती मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

शेती व्‍यवसाय करताना होणारे अपघात तसेच रस्‍त्‍यावरील अपघात व विविध कारणांनी शेतक-यांच्‍या होणा-या मृत्‍युच्‍या घटना तसेच या घटनांमध्‍ये अपंगत्‍व आल्‍यास संबधित कुटूंबाला आर्थिक मदतीचा लाभ मिळावा म्‍हणून राज्‍य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली आहे.

या योजनेचा लाभ मिळावा म्‍हणून २३ ऑगस्‍ट २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या कालावधीत राज्‍यातील २ हजार १३७ प्रस्‍ताव मंजुरीसाठी दाखल करण्‍यात आले होते. यामध्‍ये नगर जिल्‍ह्यातील २४१ प्रस्‍ताव सादर करण्‍यात आले होते. यामध्ये २३० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या आणि ११ शेतकर्यांना अंपगत्व आल्याच्या घटनांचा समावेश आहे.

जिल्‍ह्यातील २४१ कुटूबांना समारे ४ कोटी ७१ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळण्‍याचा मार्ग सुकर झाला आहे. अपघाती मृत्‍यु झाल्‍यास रुपये २ लाख व अपंगत्‍व आल्यास रुपये १ लाख रुपयांची मदत या योजनेच्‍या माध्‍यमातून दिली जात असल्याचे जिल्‍हा अधिक्षक कृषि आधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...