Kedarnath Dham: चारधामांपैकी एक प्रसिद्ध असलेले केदारनाथ मंदिराचे शुक्रवारी सकाळी 7 वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे केदारनाथ मंदिर बंद असते, परंतु उन्हाळ्याच्या आगमनासोबत मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात येते. प्रत्येक वष ही प्रक्रिया होते, ज्यामुळे भाविकांना दिव्य अनुभव मिळवता येतो. 2 मे रोजी केदारनाथ धामचे दरवाजे उघडताच भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी आधीच मोठी गद जमा झाली होती. मंत्रांचे गजर सुरू असताना दरवाजे उघडले गेले आणि भोलेनाथाच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर गजरात दुमदुमला होता.
एका आख्यायिकेनुसार, महाभारत युद्ध संपल्यानंतर, पांडवांना सर्व कौरव आणि इतर भावांना मारण्याच्या पापाचे प्रायश्चित्त करायचे होते, ज्यासाठी ते भगवान महादेवाच्या शोधात हिमालयात निघाले. पांडवांना येताना पाहून भगवान शिव अदृश्य झाले आणि केदारनाथमध्ये स्थायिक झाले. जेव्हा पांडवांना हे कळले तेव्हा तेही केदारनाथ पर्वतावर पोहोचले.
जेव्हा पांडव केदार पर्वतावर पोहोचले, तेव्हा त्यांना पाहून भगवान शिव म्हशीचे रूप धारण करून प्राण्यांमध्ये गेले. पांडवांनी भगवान शिवाचे दर्शन घेण्याची योजना आखली. त्यानंतर भीमाने महाकाय रूप धारण केले आणि आपले दोन्ही पाय केदार पर्वतावर पसरले. सर्व प्राणी भीमाच्या पायांमधून गेले, परंतु जेव्हा भगवान शिवाने म्हशीच्या रूपात पायांमधून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा भीमाने त्यांना ओळखले.
भगवान शिव यांना ओळखून, भीमाने म्हशीला पकडण्याचा प्रयत्न केला. भीमाने म्हशीचा मागचा भाग खूप लवकर पकडला. भगवान शिव पांडवांच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन देऊन त्यांच्या पापांपासून मुक्त केले. तेव्हापासून येथे भगवान शिव यांची पूजा म्हशीच्या पाठीच्या रूपात केली जाते असे म्हटलं जातं. असं मानलं जातं की म्हशीचे तोंड नेपाळमध्ये उदयास आले, जिथे भगवान शिव पशुपतिनाथ म्हणून पूजले जातात.