spot_img
अहमदनगरभर लग्नात चार लाखांचे दागिने केले लंपास; नगर तालुक्यातील घटना

भर लग्नात चार लाखांचे दागिने केले लंपास; नगर तालुक्यातील घटना

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
विवाह सोहळ्याची लगबग सुरू असताना चोरट्यांनी डाव साधत एका महिलेची चार लाख १४ हजार ५६१ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व एक नोकिया कंपनीचा मोबाईल असलेली पर्स चोरून नेली आहे. ही घटना नगर तालुक्यातील नारायणडोह शिवारातील शानिराज मंगल कार्यालयात घडली.

या प्रकरणी रामदास तुकाराम जैद (वय ६४ रा. चिंचवड, पुणे) यांनी सोमवारी (१ जुलै) सायंकाळी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी जैद यांच्या नातेवाईकांच्या मुलीचा विवाह सोहळा नारायणडोह येथील शानिराज मंगल कार्यालयात रविवारी (३० जून) दुपारी आयोजित करण्यात आला होता.

विवाह सोहळ्यासाठी फिर्यादी व त्यांची पत्नी आले होते. विवाह सोहळा पार पडल्यानंतर स्टेजवर धार्मिक विधी तसेच नवरदेव-नवरी समवेत फोटो काढण्यासाठी नातेवाईक व मित्रमंडळींनी गर्दी केली होती. फिर्यादी यांच्या पत्नीही स्टेजवर गेल्या होत्या. त्यांनी त्यांच्या कडील सोन्याचे दागिने व नोकिया कंपनीचा मोबाईल जवळील पर्समध्ये ठेवले होते.

दुपारी २.४० ते २.४५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चार लाख १४ हजार ५६१ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व नोकिया कंपनीचा मोबाईल असलेली पर्स फिर्यादी जैद यांच्या पत्नीची नजर चुकवून चोरून नेली. ही बाब उघडकीस आल्यानंतर आणि विवाह सोहळा पार पाडल्यानंतर सोमवारी सायंकाळी जैद यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...