spot_img
ब्रेकिंगबाजार समितीचे माजी संचालक रावसाहेब चोभे यांचे निधन

बाजार समितीचे माजी संचालक रावसाहेब चोभे यांचे निधन

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री-

नगर कृषि उत्पन्न बाजार समिती, नगर तालुका साखर कारखान्याचे माजी संचालक रावसाहेब मंजाबा चोभे (वय-७७) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
नगर तालुयातील बाबुर्डी बेंद गावच्या व तालुयाच्या राजकारणात ते सक्रिय होते.

१५ वर्ष त्यांनी नगर बाजार समितीचे संचालक पद भूषवले. तर नगर तालुका साखर कारखान्याचे पाच वर्ष ते संचालक होते. विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन, गावचे सरपंच पद त्यांनी भूषवले. स्व. रावसाहेब चोभे हे माजी खासदार दादापाटील शेळके यांचे एकनिष्ठ होते. स्व. चोभे यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माजी सभापती हरिभाऊ कर्डीले, अभिलाष घिगे, संचालक संतोष म्हस्के, तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, उपसभापती रभाजी सुळ, सुधीर भापकर, गोरख काळे, बन्शी कराळे, बाळासाहेब दरंदले, दत्तात्रय गिरवले, बहिरनाथ वाकळे, बबन वाकळे, दादा दरेकर, प्रशांत गहीले, डॉ. अनिल ठोंबरे यांसह विविध गावचे सरपंच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर बाजार समितीचे माजी उपसभापती रेवनणाथ चोभे, दूध संघाच्या संचालिका पुष्पाताई शरद कोठुळे यांचे ते वडील होत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बापासह चिमुकल्याच्या अंगावर टाकले उकळते तेल, पुढे घडले भयंकर…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री बापासह सात वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावर उकळते तेल टाकून जखमी केल्याची...

चार भिक्षेकर्‍यांच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, कोण म्हणाले पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात झालेल्या ४ भिक्षेकर्‍यांच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या जिल्हा शल्यचिकित्सक...

एप्रिल हिट…! रस्त्यांवर शुकशुकाट, कुठे किती तापमान…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री उन्हाचा पारा ४० अंशांच्यापुढे सरकला असून अहिल्यानगर शहरासह ग्रामीण भागात संचारबंदी...

कांद्याचे बाजारभाव पडायला शेतकरीच जबाबदार; कृषिमंत्री कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले पहा…

मुंबई | नगर सह्याद्री कृषीमंत्री माणिकराव कोकाटे वादग्रस्त विधानांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी...