spot_img
ब्रेकिंगठाकरे गटाला मोठा धक्का! अखेर शिंदे गटाने डाव टाकला? 'यांना' दिली प्रमुख...

ठाकरे गटाला मोठा धक्का! अखेर शिंदे गटाने डाव टाकला? ‘यांना’ दिली प्रमुख पदाची जबाबदारी

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सगळीकडे सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्या महाराष्ट्रभर दौरे सुरु केले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप आणि हेवे दावे करण्यात येत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांना पुन्हा आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेले विजय करंजकर यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे करंजकर हे नाराज होते. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या.

अखेर रविवारी विजय करंजकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मुंबईमध्ये शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. विजय करंजकर यांच्यावर उपनेते आणि नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर उबाठा शिवसेना गटाला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...