spot_img
ब्रेकिंगअखेर खरा चेहरा जनतेसमोर आला! गुंडगिरीची पार्श्वभूमी अन..? मंत्री विखे पाटील यांनी...

अखेर खरा चेहरा जनतेसमोर आला! गुंडगिरीची पार्श्वभूमी अन..? मंत्री विखे पाटील यांनी साधला निशाणा

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
साध्या माणसाचा खरा चेहरा आता लोकांसमोर येऊ लागला असून दहशत, गुंडगिरी अशी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीकडून जनता दुसरी कोणती अपेक्षा करणार अशा शब्दात महसूल मंत्री विखे पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला.

अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात कांटे की टक्कर पहायाला मिळत आहे. शरद पवार पक्षाच्या उमेदवारासाठी रींगणात उतरले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही विखे पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहे.

त्यातच, लंके यांनी पोलिसांना उद्देशून केलेल्या विधानामुळे ते पुन्हा चर्चत आले आहे. त्याच्या वक्तव्यावरून मंत्री विखे पाटील यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी अहमदनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातून पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी 8 वेळा संसदेत प्रतिनिधित्व केले. जनतेने मला 7 वेळा आमदार केलं आहे. हे पद्मश्रींनी दिलेल्या विचारांचे यश आहे. त्यांच्या संस्कारातच विखे परिवाराची अविरत वाटचाल सुरू आहे.

ज्यांनी जिल्ह्याच्या विकास कामात नेहमी अडसर निर्माण केली. जिल्ह्यातील विकासाची प्रक्रिया ज्यांना देखवत नाही, त्यांच्याशी जिल्ह्याच्या विकासाबाबत आपली खुली चर्चा करण्याची केव्हाही तयारी आहे. अशा शब्दात शरद पवार यांच्या प्रश्नांवर सडेतोड उत्तर त्यांनी दिले.

साध्या माणसाचा खरा चेहरा आता लोकांसमोर येऊ लागला असून दहशत, गुंडगिरी अशी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार? असा सवा उपस्थित करत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यावर निशाणा साधला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...