spot_img
महाराष्ट्रमनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा'; कोणी केली मागणी?

मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा’; कोणी केली मागणी?

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री

मराठा आरक्षणासंदर्भात सुरु असलेला वाद आता अधिकच चिघळला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना मनोज जरांगेंनी इशारा दिल्यानंतर ओबीसी समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

ओबीसी समाजाचे नेते बबनराव तायवाडे यांनी या इशाऱ्याचा निषेध करत, मनोज जरांगे समाजात तेढ निर्माण करत आहेत; त्यामुळे त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. .

दरम्यान, मनोज जरांगेंनी तायवाडेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, दोन वर्षांपूर्वी अंबड येथे झालेल्या सभेचा दाखला दिला आणि छगन भुजबळ यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे

या सर्व पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी १० ऑक्टोबर रोजी हैदराबाद गॅझेटियरच्या जीआरविरोधात आंदोलनाची घोषणा केल्यानंतर, हा संघर्ष अधिक उफाळून आला आहे. वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाच्या हक्कांचे रक्षण करण्याचा नारा दिला, जो थेट मनोज जरांगेंच्या टीकेचा विषय ठरला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आंदोलकांवरील ११ गुन्हे मागे घेण्यास मान्यता, न्यायालयीन प्रक्रिया सुरू

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान नगर जिल्ह्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी...

नगर हादरले! धाकट्या भावाने केला मोठ्या भावावर वार; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- स्टेशन रोडवरील न्यू बेथेल कॉलनीत कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत असलेल्या...

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; आमदार शिवाजीराव कर्डिले यांची मोठी माहिती, वाचा पत्रकार परिषद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून भरघोस निधी देण्यात...

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत करा; ठाकरे गटाची मागणी, तहसीलदारांना निवेदन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या, घरे व पशुधनाच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तातडीने...