spot_img
अहमदनगरकांदा पिकावर पडलेल्या 'या' रोगामुळे शेतकरी चिंतेत

कांदा पिकावर पडलेल्या ‘या’ रोगामुळे शेतकरी चिंतेत

spot_img

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव, आढळगाव, बेलवंडी कोठार, देऊळगाव, परिसरात वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

कांदा पीक शेतकर्‍यांचे नगदी पीक मानले जाते परंतु विचित्र हवामान, अवकाळी पाऊस, यामुळे जमिनीतील बुरशीचे प्रमाण वाढले आहे. रोप व लागवड झालेला कांदा अज्ञात रोगाने अचानक पिवळा पडून कांदा रोपाला गोलाकार आळे पिळे पडले असल्यामुळे पीक धोक्यात आले आहे.

शेतकर्‍यांनी फवारणी देखील केली परंतु ढगाळ वातावरण तसेच दाट धुके यांमुळे कांदा पिके खराब झाली. यावर्षी पोषक हवामान नसल्याने शेतकर्‍यांना कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

शेतकर्‍याचे आर्थिक गणित कोलमडणार
५ जानेवारी रोजी तीन एकर कांदा पिकाची लागवड केली होती. बी बियाणे, कांदा रोपे, खते, लागवड, नांगरणी यासाठी आजपर्यंत ८५ ते ९० हजार रुपये खर्च झाला आहे. मात्र वातावरण बदलाने कांदा पिक अचानक पिवळे पडून बुरशी प्रमाण वाढल्याने फवारणीचा खर्च वाढला आहे. वातावरण असेच राहिले तर कांदा पीक सोडून द्यावे लागणार असून शेतकर्‍याचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.
– शेतकरी सतीश पाडाळे, उमेश पाडाळे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

तुम्ही काट माराल तर मीही काट मारणार, उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले…

बारामती / नगर सह्याद्री : बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित...

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, सोलापूरमध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू

सोलापूर / नगर सह्याद्री : देवदर्शनाला जाताना भाविकांवर काळाने घाला घातल्याची घटना सोलापूरमध्ये झाली आहे....

जगताप -विखे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश ; तब्बल २६ कोटी निधी मंजूर, काय होणार पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - आमदार संग्राम जगताप व माजी खासदार डॉ.सुजय विखे यांच्या पाठपुराव्याने...

मोठी बातमी! काँग्रेसची ‘मनसे’ साथ? विजय वडेट्टीवार यांचे मोठे संकेत काय?

मुंबई / नगर सह्याद्री मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबईतील स्थानिक नेतृत्वाला...