spot_img
अहमदनगरखळबळजनक ! शहरातून मुली, मुले बेपत्ता, आ. जगताप आक्रमक

खळबळजनक ! शहरातून मुली, मुले बेपत्ता, आ. जगताप आक्रमक

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : शहरातून मुले मुली बेपत्ता होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. वैभव म्हस्के (वय १५ वर्षे रा. माणिकनगर), कोमल शिंदे (वय २३ वर्षे रा.दुधसागर) हे अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत.

परंतु त्यांचा शोध मात्र लागत नाही. त्यामुळे आ. संग्राम जगताप यांनी आक्रमक होत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला याना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटलं आहे की, शहरातील मुले बेपत्ता होतात. त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार देऊनही पोलीस मात्र तपास लावण्यात अपयशी ठरत आहे. मुलांचा तपास लागत नसल्याने कुटुंबीय, नातेवाईक हे मात्र चिंताग्रस्त झाले आहेत. बेपत्ता मुलांच्या आईवडिलांची मानसिक स्थिती अत्यंत खराब झाली आहे.

परंतु बेपत्ता मुलांचा काहीच थांगपत्ता लागत नाहीत. शहरातील मुले बेपत्ता होऊन २० ते २५ दिवस झाले आहेत. परंतु पोलिसांना तपास लावण्यात यश मिळाले नाही. तरी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन बेपत्ता मुलामुलींचा तपास तातडीने करावा अशी मागणी या निवेदनात केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे, सुमित कुलकर्णी, श्रेणिक शिंगवी, पालक नातेवाईक उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा ऍक्शन मोडमध्ये! ईतक्या गाळ्यांना ठोकले सील, कारवाई तीव्र करणार..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी महानगरपालिकेने शास्तीमध्ये जानेवारी अखेरपर्यंत...

माणुसकीला काळीमा फासणारी घटना; मुलासमोरच पत्नीची हत्या! कारण आलं उजेडात..

पुणे । नगर सहयाद्री पुण्याच्या खराडी भागातील एक धक्कादाक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना...

गँगस्टर छोटा राजनचा साथीदारस बेड्या; ‘असा’ अडकला जाळ्यात

मुंबई ।नगर सहयाद्री:- गँगस्टर छोटा राजनचा जवळचा साथीदार कुख्यात गुंड डीके रावला अटक करण्यात...

श्रीरामपुरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे; तीन महिन्यात तीन गोळीबार!

श्रीरामपुर । नगर सहयाद्री:- निवृत्ती नंतर सुखी, सुरक्षित राहण्यासाठी नावलौकिक असलेल्या श्रीरामपूर शहरात काय...