spot_img
अहमदनगरखळबळजनक ! शहरातून मुली, मुले बेपत्ता, आ. जगताप आक्रमक

खळबळजनक ! शहरातून मुली, मुले बेपत्ता, आ. जगताप आक्रमक

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : शहरातून मुले मुली बेपत्ता होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. वैभव म्हस्के (वय १५ वर्षे रा. माणिकनगर), कोमल शिंदे (वय २३ वर्षे रा.दुधसागर) हे अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत.

परंतु त्यांचा शोध मात्र लागत नाही. त्यामुळे आ. संग्राम जगताप यांनी आक्रमक होत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला याना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटलं आहे की, शहरातील मुले बेपत्ता होतात. त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार देऊनही पोलीस मात्र तपास लावण्यात अपयशी ठरत आहे. मुलांचा तपास लागत नसल्याने कुटुंबीय, नातेवाईक हे मात्र चिंताग्रस्त झाले आहेत. बेपत्ता मुलांच्या आईवडिलांची मानसिक स्थिती अत्यंत खराब झाली आहे.

परंतु बेपत्ता मुलांचा काहीच थांगपत्ता लागत नाहीत. शहरातील मुले बेपत्ता होऊन २० ते २५ दिवस झाले आहेत. परंतु पोलिसांना तपास लावण्यात यश मिळाले नाही. तरी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन बेपत्ता मुलामुलींचा तपास तातडीने करावा अशी मागणी या निवेदनात केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे, सुमित कुलकर्णी, श्रेणिक शिंगवी, पालक नातेवाईक उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ! ‘बड्या’ नेत्याचे अपहरण अन् मारहाण, VIDEO आला समोर..

श्रीरामपूर। नगर सहयाद्री:- अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे. अपहरण करतानाचे...

निवडणूकीचा प्रचारात राडा! काँग्रेस नेत्याचा भयंकर प्रताप; भाजपचा प्रचार करणाऱ्या…

Political News: नागपूरमध्ये कळमेश्वर निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांना आरिफ शेख...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींवर महालक्ष्मीची कृपा होणार, दुप्पट नफा मिळणार ! जाणून घ्या तुमचा आजचा दिवस!

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. थोड्या...

सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह, शहरात खळबळ

Maharashtra Crime News : डोंबिवलीमधील डायघर परिसरातील खाडीत एका सुटकेसमध्ये २५ महिलेचा मृतदेह सापडला...