spot_img
अहमदनगरAhmednagar: खळबळजनक!! दोन दिवसात तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण

Ahmednagar: खळबळजनक!! दोन दिवसात तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी पीडित अल्पवयीन च्यामुलीं पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एक गुन्हा रविवारी दाखल करण्यात आला आहे.

भिंगार शहरातील एका अल्पवयीन मुलीला (वय १५) रविवारी दुपारी १२ वाजता तिच्या राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. तिच्या नातेवाईकांनी मुलीचा शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. त्यानंतर आईने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके करीत आहेत.

नगर तालुयातील एका गावातील अल्पवयीन मुलीला (वय १२) अज्ञात व्यक्तीने शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास पळवून नेले. मुलीच्या नातेवाईकांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी मुलीचा परिसरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही. मुलीच्या वडिलांनी रविवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ करीत आहेत.

अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तिसरी घटना नगर तालुयातील एका गावात घडली. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीला (वय १३) अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. नातेवाईकांनी शोध घेऊनही ती मिळून आली नाही. या प्रकरणी मुलीच्या आईने रविवारी दुपारी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...