spot_img
अहमदनगरAhmednagar News : इथेनॉल बंदीचा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऊस दरावर काहीच परिणाम होणार...

Ahmednagar News : इथेनॉल बंदीचा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऊस दरावर काहीच परिणाम होणार नाही, खा. विखे यांचा खुलासा

spot_img

नगर सह्याद्री / अहमदनगर : सध्या इथेनॉल बंदीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्राने आदेश दिल्यानंतर कारखान्यातील इथेनॉल निर्मिती थाम्बली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी एफआरपी दर द्यावा लागेल, याने शेतकरी अडचणीत येतील असे म्हटले जात आहे.

रंतु आता खा. सुजय विखे पाटील यांनी असे काही होणार नसल्याचे म्हटले आहे. देशातील साखर कारखान्यातील इथेनॉल निर्मिती बंदीचा ऊस दरावर कोणताच परिणाम होणार नाही. उलट केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एफआरपीनूसार शेतकर्‍यांना दर द्यावे लागतील. इथेनॉल बंदीचा विषय थेट शेतकर्‍यांशी निगडीत नाही यामुळे त्याचा काहीही परिणाम होणार नाही असे खा. विखे म्हणाले आहेत.

नगरमध्ये ते माध्यमाशी बोलताना त्यांनी अनेक खुलासे केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील टीका केली. ते म्हणाले की, अनेक लोकांना भास व गैरसमज होत आहेत. ते दिवसा स्वप्न पाहात आहेत.

त्यामुळे त्यांनी एकदा मनपाने सुरू केलेल्या एमआरआय सेंटरमध्ये जाऊन मेंदू तपासून घेऊन ते फोटो घेऊन माझ्यासारख्या न्यूरोसर्जन डॉक्टरला दाखवावे व गैरसमज दूर करावा. वेळ पडल्यास मी त्यांचा इलाज करू शकतो व अजूनही वेळ गेलेली नाही असा सूचक तोलाच टोला खा. डॉ. विखे यांनी लगावला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...