spot_img
अहमदनगरAhmednagar News : इथेनॉल बंदीचा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऊस दरावर काहीच परिणाम होणार...

Ahmednagar News : इथेनॉल बंदीचा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऊस दरावर काहीच परिणाम होणार नाही, खा. विखे यांचा खुलासा

spot_img

नगर सह्याद्री / अहमदनगर : सध्या इथेनॉल बंदीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्राने आदेश दिल्यानंतर कारखान्यातील इथेनॉल निर्मिती थाम्बली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी एफआरपी दर द्यावा लागेल, याने शेतकरी अडचणीत येतील असे म्हटले जात आहे.

रंतु आता खा. सुजय विखे पाटील यांनी असे काही होणार नसल्याचे म्हटले आहे. देशातील साखर कारखान्यातील इथेनॉल निर्मिती बंदीचा ऊस दरावर कोणताच परिणाम होणार नाही. उलट केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एफआरपीनूसार शेतकर्‍यांना दर द्यावे लागतील. इथेनॉल बंदीचा विषय थेट शेतकर्‍यांशी निगडीत नाही यामुळे त्याचा काहीही परिणाम होणार नाही असे खा. विखे म्हणाले आहेत.

नगरमध्ये ते माध्यमाशी बोलताना त्यांनी अनेक खुलासे केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील टीका केली. ते म्हणाले की, अनेक लोकांना भास व गैरसमज होत आहेत. ते दिवसा स्वप्न पाहात आहेत.

त्यामुळे त्यांनी एकदा मनपाने सुरू केलेल्या एमआरआय सेंटरमध्ये जाऊन मेंदू तपासून घेऊन ते फोटो घेऊन माझ्यासारख्या न्यूरोसर्जन डॉक्टरला दाखवावे व गैरसमज दूर करावा. वेळ पडल्यास मी त्यांचा इलाज करू शकतो व अजूनही वेळ गेलेली नाही असा सूचक तोलाच टोला खा. डॉ. विखे यांनी लगावला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान कोसळले

नगर सह्याद्री वेब टीम Tejas fighter jet crashes: दुबईमध्ये एअर शो प्रात्यशिकात भाग घेतलेल्या तेजस...

आमदार-खासदारांशी कसं वागणार? सरकारचा कर्मचाऱ्यांना ९ कलमी कार्यक्रम…

आमदार-खासदारांच्या पत्रांना दोन महिन्यांत उत्तर देण्याचं अनिवार्य केलंय / नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई...

कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड; सयाजी शिंदे सरकारवरसंतापले? आम्ही मरायलाही तयार…

मुंबई / नगर सह्याद्री - सयाजी शिंदे हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी मराठी,...

रिक्षा थांबविण्याच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री येथील माळीवाडा बस स्थानक परिसरात रिक्षा थांबवण्याच्या किरकोळ वादातून दोन आरोपींनी...