spot_img
अहमदनगरAhmednagar: फुले दाम्पत्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारा; 'यांनी' दिले निवेदन

Ahmednagar: फुले दाम्पत्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारा; ‘यांनी’ दिले निवेदन

spot_img

महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
अहमदनगर | नगर सह्याद्री
महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारावेत अशी मागणी महानगरपालिका आयुक्तांकडे करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले कृती समितीने निवेदन दिले. यावेळी कृती समितीचे प्रा.माणिकराव विधाते, अशोकराव कानडे, ज्ञानेश्वर रासकर, आनंद पुंड, मळू गाडळकर, दीपक खेडकर, भरत गारुडकर, ब्रिजेश ताठे आदींसह सदस्य उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, आ. संग्राम जगताप यांच्या संकल्पनेमधून अहमदनगर शहरामध्ये विविध ठिकाणी महामानवांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महापालिकेच्या आवारात बसविण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम प्रोफेसर कॉलनी चौकात सुरु आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा उभारणीच्या कामाचेही भूमिपूजन झाले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु असून या महापुरुषाने गोरगरीब बहुजनांच्या उद्धारासाठी मोठे कार्य केले आहे. त्यामुळे आपणास कृती समितीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारणीबाबत कार्यवाही करावी. यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनीही या कामाचे भूमिपूजन लवकरच करू असे आश्वासन दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा गाड्यांच्या माध्यमातून करदात्यांची लूट ; नगरसेवक योगीराज गाडे काय म्हणाले पहा

अहिल्यानगर । नगर सह्याद्री महापालिका व आयुक्त यशवंत डांगे जनतेची दिशाभूल करत असून नव्या कचरा...

आयुक्त डांगेंच्या नियुक्ती चौकशीचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, नेमकं प्रकरण काय पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर...

धक्कादायक ! डॉक्टर महिलेच्या मृत्यूचा PM रिपोर्ट आला पण…’या’ प्रश्नांचं गूढ अद्याप कायम

सातारा / नगर सह्याद्री - सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या युवा...

बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम; पारनेरचे भूमिपुत्र आंदोलनात दाखल

पारनेर / नगर सह्याद्री - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी...