spot_img
अहमदनगरAhmednagar: फुले दाम्पत्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारा; 'यांनी' दिले निवेदन

Ahmednagar: फुले दाम्पत्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारा; ‘यांनी’ दिले निवेदन

spot_img

महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
अहमदनगर | नगर सह्याद्री
महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारावेत अशी मागणी महानगरपालिका आयुक्तांकडे करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले कृती समितीने निवेदन दिले. यावेळी कृती समितीचे प्रा.माणिकराव विधाते, अशोकराव कानडे, ज्ञानेश्वर रासकर, आनंद पुंड, मळू गाडळकर, दीपक खेडकर, भरत गारुडकर, ब्रिजेश ताठे आदींसह सदस्य उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, आ. संग्राम जगताप यांच्या संकल्पनेमधून अहमदनगर शहरामध्ये विविध ठिकाणी महामानवांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महापालिकेच्या आवारात बसविण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम प्रोफेसर कॉलनी चौकात सुरु आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा उभारणीच्या कामाचेही भूमिपूजन झाले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु असून या महापुरुषाने गोरगरीब बहुजनांच्या उद्धारासाठी मोठे कार्य केले आहे. त्यामुळे आपणास कृती समितीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारणीबाबत कार्यवाही करावी. यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनीही या कामाचे भूमिपूजन लवकरच करू असे आश्वासन दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...